तिसरी राष्ट्रीय लोकअदालत : रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

🌏 तिसरी राष्ट्रीय लोकअदालत : रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड

 

सात कोटी सात लाखाहून अधिक रकमेची तडजोड – वकील व पक्षकारांचा उस्फूर्त सहभाग

 

रत्नागिरी (जिमाका): मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांत तिसऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

 

या लोकअदालतीचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

 

लोकअदालतीत जिल्ह्यातील 4 हजार 813 न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे आणि 15 हजार 345 दाखलपूर्व वाद ठेवण्यात आले होते. त्यापैकी 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन वाद संपुष्टात आले. या तडजोडीतून ₹7 कोटी 7 लाख 79 हजार 509 रुपयांची रक्कम वसूल झाली.

 

यामध्ये प्रलंबित दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी खटले, धनादेशाशी संबंधित खटले, वैवाहिक वाद, तसेच दाखलपूर्व नगरपालिका, ग्रामपंचायत कर वसुली, बँका व पतसंस्था थकबाकी, विजबिले, टेलिफोन बिले, मोटार वाहन चलन इत्यादी प्रकरणांचा समावेश होता.

 

या लोकअदालतीच्या यशामागे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील व सर्व कर्मचारी, तसेच तालुका समित्यांतील न्यायाधीश व कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला.

 

 

 

📌 हॅशटॅग

 

#Ratnagiri #लोकअदालत #NationalLokAdalat #जिल्हान्यायालय #MaharashtraNews #LegalServices

 

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]