नायगाव येथे बौ. पं. स. शा क्र. ५७९ च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नायगाव येथे बौ. पं. स. शा क्र. ५७९ च्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नवीमुंबई (मंगेश जाधव)
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ रोजी गतीमान केलेला ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन तथा महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोका विजयादशमी दिन बौद्धजन पंचायत समिती शा. क्र. ५७९ व संघमित्रा महिला मंडळ यांच्या वतीने गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी ज्योतिबा रहिवाशी संघ, महात्मा फुले रोड, नायगाव, दादर (पु.) मुंबई – १४. येथे शाखा अध्यक्ष आयु. राहुल गजानन अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
सकाळी संघमित्रा महिला मंडळ च्या अध्यक्षा आयुनी. दामिनी दिपक तांबे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केल,तर महिला मंडळ यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सायं. कु.कनिष्क अहिर, कु.कनिष्का अहिरे, आयुनी. प्रविणा साळवी, आयु. राहुल अहिरे, आयुनी. ज्योती तांबे, आयुनी. अविका तांबे यांनी गिते गाऊन उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर उपस्थित संघमित्रा महिला मंडळ च्या अध्यक्षा आयुनी दामिनी तांबे, खजिनदार आयुनी आशा गायकवाड, माजी अध्यक्षा आयुनी किरण अहिरे व सर्वच महिलांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रिपब्लिकन सेना मुंबई उपाध्यक्ष, समाजसेवक आयु. आशिष (बंटी) बाफना यांनी सांगितले की मी जरी दुसऱ्या धर्माचा असलो तरी मी आपल्यामध्येच असतो आणि हाच माझा परिवार आहे, म्हणून समाजातील गरजूंना सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली व कार्यक्रमाला भोजन दान केले. तसेच प्रमुख मार्गदर्शक बौद्धजन पंचायत समिती गट क्रं. १४ चे गट प्रतिनिधी आयु. संदेश खैरे, बौ.पं.स. शा. क्र. ११० चे अध्यक्ष आयु. सुनील जाधव, बौ.पं.स.शा.क्र.११३ चे उपाध्यक्ष आयु. ऍड. दिपक मोरे, बौ.पं.स.शा.क्र.८१६ चे अध्यक्ष आयु. राजेंद्र कांबळे, बौ.पं.स. १११ चे चिटणीस आयु. सुशील जाधव, बौ.पं.स. १०४ चे खजिनदार आयु. संगम ताम्हाणेकर, वंबआ चे निरीक्षक आयु. अरुण वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा चे कार्याध्यक्ष आयु. मधुकर रुके, अध्यक्ष आयु. सिद्धार्थ सकपाळ, आयु. टपाल. बौ.पं.स.शा.क्र. ५७९ चे माजी चिटणीस आयु. प्रमोद जाधव, माजी उपचिटणीस शशिकांत नागावकर, आयु. अजित मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला शाखेतील महिला/पुरुष सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिटणीस आयु. सुदिप अहिरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल अहिरे, जयवंत तांबे, सुदिप अहिरे, निलेश साळवी, रोहित तांबे, दिपेश माने, दामिनी तांबे, किरण अहिरे, ज्योती तांबे, अविका तांबे यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाला आरती प्रतीष्ठान दामिनी तांबे, अरुण वाघमारे यांच्या वतीने समोसे दान, सचिन कांबळे यांच्या वतीने लाडू दान, अतुल शिर्के यांच्या वतीने पाणी दान, बंटी बाफना यांच्या वतीने भोजन दान, बनसोडे मामा यांच्या वतीने साऊंड, सुदिप अहिरे, मनोज जाधव यांनी लायटिंग तसेच सर्व मान्यवर, शाखेचे सर्व सन्मा. आजी-माजी पदाधिकारी, सभासद आणि महिला मंडळ यांचे आभार व्यक्त करुन महिलांनी गरबा नृत्यावर ठेका धरून (नाचून) कार्यक्रम संपन्न केला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]