राज्यात ३२ जिल्हा परिषद, ३३१ पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया

rv news

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात ३२ जिल्हा परिषद, ३३१ पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल; ५ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया

११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती; हजर झालेल्या अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा दुसरा टप्पा नोव्हेंबरअखेर जाहीर होणार

मुंबई : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल आता औपचारिकपणे वाजण्याच्या मार्गावर आहे. पाच डिसेंबरपासून या निवडणुकांसाठी अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन असून संपूर्ण दुसरा टप्पा ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे अत्यावश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सरकारला कळविले होते. त्यानुसार महसूल व वन विभागाने ७ नोव्हेंबर रोजी ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नतीचे आदेश काढले.

पदोन्नती मिळालेल्या या अधिकाऱ्यांपैकी काहींनी पसंतीपत्रे दिली असली, तरी अजूनही अनेक जण बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा जाहीर करण्यात उशीर होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व विभागीय आयुक्तांना पत्र लिहून, पदोन्नती झालेले उपजिल्हाधिकारी किती हजर झाले याचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या अहवालाच्या आधारे नोव्हेंबरअखेर दुसरा टप्पा जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठी आयोगाने पाच डिसेंबरपासून अर्ज स्वीकृती सुरू करण्याचा रोडमॅप आखला आहे. त्यानंतर

  • सुमारे ७ दिवस अर्ज स्वीकृती,
  • ७ दिवस अर्ज छाननी व अर्ज माघार,
  • त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर,
  • तर प्रचारासाठी सुमारे ६ दिवसांचा अवधी ठेवण्याचे नियोजन आहे.

मतदान, मतमोजणी आणि विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होत आहेत.

  • पहिल्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका,
  • दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका,
  • तर शेवटच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकदाच होणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारीपर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे.


निवडणुकांचे दोन मोठे टप्पे असे…

  • 🗳 जिल्हा परिषदा : ३२
  • 🗳 पंचायत समित्या : ३३१
    • अंदाजे निवडणूक कालावधी : २३ ते २५ दिवस
  • 🏙 महापालिका : २९
    • अंदाजे निवडणूक कालावधी : २५ दिवस

हॅशटॅग्स

#MaharashtraElection
#स्थानिकस्वराज्यनिवडणुका
#ZillaParishadElection
#PanchayatSamitiElection
#महापालिका_निवडणूक
#राज्यनिवडणूकआयोग
#MaharashtraPolitics
#MumbaiNews
#Election2025
#LocalBodyPolls

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]