विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा …डॉ मनोज पाटील

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा …डॉ मनोज पाटील

गुहागर ~प्रतिनिधि 

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून त्यांनी विविध देशांचा राज्यघटनांचा अभ्यास करून जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना लिहिली.ही आपल्यासाठी ,भारतवासीयांसाठी सर्वात मोठी देणगी

आहे.या संविधानापेक्षा भारतामध्ये कोणीच मोठे नाही.शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा व्यासंग घडवून पुस्तकाशी नाते जोडावे ,वाचनाचा छंद जोपासावा, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे जीवनात वाटचाल करावी असे प्रतिपादन वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये संपन्न झालेल्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील यांनी केले.त्यावेळी सर्व शिक्षक वृंद ,पदवीधर शिक्षका अफसाना मुल्ला मॅडम ,सुषमा गायकवाड मॅडम विद्यार्थी प्रतिनिधी अनिश पालशेतकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी आरोही रोहीलकर, सांस्कृतिक मंत्री अन्वी जांभारकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते,. मुख्याध्यापक मनोज पाटील यांचे शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शाळेतील शिक्षक सुषमा गायकवाड व अफसाना मुल्ला मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसाना मुल्ला मॅडम तर आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड मॅडम यांनी केले

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]