रत्नागिरी हापूस विरुद्ध बळासाड (गुजरात) हापूस वाद ऍड. असीम सरोदे यांची पोस्ट व्हायरल – ‘कोकणातील हापूस नाकारून विकासाच्या नावाखाली उद्योग लावण्याचा प्रयत्न’ असा आरोप.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📌 रत्नागिरी हापूस विरुद्ध बळासाड (गुजरात) हापूस वाद

ऍड. असीम सरोदे यांची पोस्ट व्हायरल – ‘कोकणातील हापूस नाकारून विकासाच्या नावाखाली उद्योग लावण्याचा प्रयत्न’ असा आरोप.

रत्नागिरी/कोकण

गुजरातच्या वलसाड हापूसला जागतिक भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळावे यासाठी सुरू असलेल्या हालचालींवरून कोकणात तगडा वाद उसळला आहे. कोकणातील हापुसचा इतिहास, चव आणि ब्रँड ओळख जगभर मान्य असताना गुजरातकडून असा दावा केला जाणे हा केवळ आंब्यापुरता मुद्दा नसून त्यामागे वेगळे ‘इंटरेस्ट’ असल्याचा आरोप ऍड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर केला असून त्यांची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

सरकार कोकणात मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स सारखा करोड़ो रुपयांचा प्रकल्प राबविण्याच्या तयारीत असल्याचा संदर्भ देत, सरोदे म्हणतात की, हापूस फक्त कोकणाचाच आहे हे सत्य पुसून टाकण्यासाठी वातावरण तयार केले जात आहे.


🔻 “कोकणातील हापूस, काजू, नारळ, समुद्र – सर्व संपवून उद्योग आणण्याचा प्रयत्न?”

सरोदे यांचे म्हणणे आहे की कोकणातील नैसर्गिक संपदेमध्ये केवळ आंबाच नव्हे तर काजू, नारळ, मासेमारी व समुद्री जैवविविधता यांचा समावेश होतो.

त्यांनी पुढे लिहिले––

“समुद्र प्रदूषित केला जातोय, मास्यांचे प्रकार कमी होत आहेत, कृषीक्षेत्रावर गदा येतेय. सगळं उद्ध्वस्त करून कोणता विकास करायचा आहे? हा प्रश्न आता सामान्यांनीच विचारायला हवा.”

त्यांच्या पोस्टमुळे रत्नागिरी हापूस विरुद्ध गुजरात हापूस वाद आणखी तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.


 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]