बेनी बु. परिसरात वानर आणि गवारेड्यांकडून आंबा बागायतीचे नुकसान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बेनी बु. परिसरात वानर आणि गवारेड्यांकडून आंबा बागायतीचे नुकसान

जितेंद्र चव्हाण यांचकडून 

रत्नागिरी –  लांजा तालुक्यातील साटवली नंतर बेनी बुद्रुक गावाकडे वानरानी आपला मोर्चा वळवला असून या वानरानी तयार होणाऱ्या आंबा फळांना आपले लक्ष केले आहे. आंब्याची तयार होणारी फळे हे खाऊन, चावून नाजदूस केली जात आहे. गवारेड्यांकडून देखील अशा प्रकारे नुकसान केले जात असल्याने आंबा बागायतदार व शेतकरी पुरता हैराण झाला आहे.

बेनी बु. परिसरात वानर आणि गवारेड्यांकडून आंबा बागायतीचे नुकसान

बेनी बुद्रुक कुसुमळेवाडी येथील शेतकरी दीपक परशुराम सुर्वे यांच्या बागेतील वानर व गवारेडे यांनी अशा प्रकारे आंब्याच्या फळांची मोठी नुकसान केली आहे. आंब्याच्या झाडाखाली तयार होणाऱ्या फळांची नाजदूस केली जात आहे. तयार होणारी आंबा फळे खाऊन टाकली जात आहेत. त्यामुळे या तयार होणाऱ्या आंबा पिकांना माकडांचा उपद्रव असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान भरपाईला सामोरे जावे लागत आहे. तसेच गवा रेड्यांकडून देखील खाली होणाऱ्या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केली जात आहे. तयार होणारी आंबा फळे खाऊन टाकली जात आहेत. त्यामुळे या तयार होणाऱ्या आंबा पिकाला व हाता तोंडाला आलेल्या उत्पन्नाला माकड, गवारेडे यांच्याकडून होणाऱ्या नुकसानीला आंबा बागायतदार शेतकरी यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तसेच मोठ्या प्रमाणामध्ये गवारेड्या कडून देखील नुकसान केली जात आहे.

 

त्यामुळे वानर व गवारड्यांचा बंदोबस्त रत्नागिरी वन विभागाने तसेच लांजा वन विभागाने तात्काळ करावा अशी मागणी येथील आंबा बागायतदार उत्पादक शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]