नागपुरात धार्मिक तणाव: चादर जाळल्याच्या घटनेनंतर मुस्लिम समाजाची संतप्त प्रतिक्रिया

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नागपुरात धार्मिक तणाव: चादर जाळल्याच्या घटनेनंतर मुस्लिम समाजाची संतप्त प्रतिक्रिया

नागपुरात धार्मिक तणाव: चादर जाळल्याच्या घटनेनंतर मुस्लिम समाजाची संतप्त प्रतिक्रिया

नागपूर: मागील काही महिन्यांपासून औरंगजेबाच्या मुद्द्यावरून सातत्याने धार्मिक तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुस्लिम समाजाने संयम बाळगला. तरीही समाजाला चिथावण्यासाठी आता ‘आयत’ असलेली चादर जाळल्याची घटना घडली. त्यानंतर काही भागांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, या घटनेनंतर पोलिसांनी भेदभाव करत केवळ मुस्लिम समाजावरील कारवाईला प्राधान्य दिल्याचा आरोप नागपूर मुस्लिम कम्युनिटीने बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

 

सोमवारी रात्री मध्य नागपुरात दंगल उसळल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, मुस्लिम नेत्यांनी पोलिसांवर निष्पक्ष कारवाई न केल्याचा आरोप केला आहे.

 

मुस्लिमांना चिथावण्याचे षडयंत्र”

 

पत्रकार परिषदेत डॉ. मोहम्मद अवेस हसन यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने संयम बाळगला असला तरी, काही कट्टरवादी गटांकडून त्यांना चिथावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. “विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिमांसाठी पवित्र मानली जाणारी ‘आयत’ असलेली चादर जाळली. हा मुद्दा अत्यंत संवेदनशील असून, समाजाच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न आहे,” असे ते म्हणाले.

 

यामुळे काही भागांत नैसर्गिक संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, त्याला संपूर्ण मुस्लिम समाजाशी जोडणे चुकीचे आहे. “दुर्दैवाने, पोलिसांनी निष्पाप मुस्लिम युवकांवर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल केले, तर प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्या लोकांवर केवळ सौम्य कारवाई केली आणि त्यांना काही तासांत सोडून दिले,” असा आरोप त्यांनी केला.

 

सरकारने एका बाजूने भूमिका घेतली”

 

माजी मंत्री अनीस अहमद यांनी राज्य सरकारवरही टीका केली. “सरकारने दोन्ही समाजांना समान न्याय द्यावा, परंतु येथे एका समाजाला लक्ष्य केले जात आहे. निष्पाप तरुणांना अटक केली जात असून, काही अल्पवयीन मुलांवरही कठोर कायदे लावण्यात आले आहेत. ही पक्षपाती भूमिका लोकशाहीसाठी घातक आहे,” असे ते म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेण्याची मागणी

 

नागपूर मुस्लिम कम्युनिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. “शांतता राखण्यासाठी तातडीने ‘शांतता समिती’ स्थापन करावी. संचारबंदी उठवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी मागणी करण्यात आली.

 

या पत्रकार परिषदेला डॉ. मोहम्मद अवेस हसन, हाजी मोहम्मद ताहिर रजा, मुक्ती मुज्तबा शरीफ, माजी मंत्री अनीस अहमद, ॲड. आसिफ कुरैशी, फैसल रंगूनवाला, ॲड. सैयद शूजाउद्दीन आदी उपस्थित होते.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा