समाजात वाचन संस्कृती रुजली पाहिजे – डॉ. धनंजय शिंदे
रांजणगाव गणपती येथे राज्यस्तरीय साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
पुणे (प्रतिनिधी) – विवेकानंद फंड
महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने रांजणगाव गणपती येथे आयोजित राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती गौरव पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. कथा, कविता, कादंबरी, बालसाहित्य, ललित अशा विविध प्रकारात लेखन करणाऱ्या महाराष्ट्रभरातील १० साहित्यिकांचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.
दिपक तांबोळी, लक्ष्मण दिवटे, दत्ता पाटील, कमलाकर राऊत, बाळकृष्ण बाचल, उत्तम सदाकाळ, गणेश भाकरे, प्रकाश बोधे, सुभा लोंढे आणि अलकनंदा घुगे या साहित्यिकांना सन्मान चिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
शिरूर तालुक्यातील संभाजी शिवले, शंकर न-हे, दत्तात्रय जगताप, दादाभाऊ गावडे व रुपाली भोरकडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. धनंजय शिंदे (कावीळ तज्ज्ञ, मांडवगण फराटा) होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. संदीप सांगळे (अध्यक्ष, मराठी अभ्यासमंडळ, पुणे विद्यापीठ) आणि ज्येष्ठ प्रबोधनकार उत्तम अण्णा भोंडवे उपस्थित होते.
डॉ. शिंदे यांनी समाजात वाचन संस्कृती रुजवणे गरजेचे असल्याचे सांगत साहित्यिकांना प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. सांगळे यांनी साहित्यिकांचे सामाजिक परिवर्तनात महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर परदेशी, प्रास्ताविक प्रा. कुंडलिक कदम, तर मनोगत व्यक्त करणाऱ्यांमध्ये शेखर फराटे, प्रकाश बोधे, रुपाली भोरकडे यांचा समावेश होता.
विवेकानंद फंड यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
#SahityaPuraskar2025 #MarathiLiterature #VachanSanskriti #SahityaParishad #RanjangaonEvents #MaharashtraWriters #SahityikGaurav #ShirurNews #ReadingCulture #MarathiBooks #RajyastariyaPuraskar #LiteratureAwards #DrDhananjayShinde #ProfSandeepSangle #VivekanandFund
















