???? मंत्रालयही अदानीला देणार का? – काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांचा संतप्त सवाल!
धारावी पुनर्वसनात कुर्ल्याची सरकारी जागा अदानीला देण्याच्या निर्णयावर काँग्रेसची सरकारवर घणाघाती टीका
मुंबई, ५ जून – “मुंबईतील विमानतळ, कचराभूमी, सरकारी जमिनी एकामागोमाग ‘अदानी’ला दिल्या जात आहेत. आता फक्त मंत्रालय आणि विधानभवन उरले आहेत. तेही कधी अदानीला देणार?” असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला उद्देशून केला आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी कुर्ल्याची मदर डेअरीची जागा अदानीला हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर सपकाळ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या जागेच्या हस्तांतरणासाठी करारातील अटी व शर्ती बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
???? शेतकऱ्यांना नाही, पण अदानीला तत्पर निधी!
सपकाळ म्हणाले, “राज्यात वळिवामुळे शेतकरी अडचणीत आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निधी नाही, कर्जमाफीसाठी पैसा नाही. पण अदानीला मात्र सरकार झपाट्याने सर्व काही देत आहे. एवढं अदानीला देऊन महाराष्ट्राला काय मिळणार?”
काँग्रेस लवकरच राज्यातील शेती नुकसानीची पाहणी करून राज्यपालांना निवेदन देणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
???? फोटो
???? हॅशटॅग्स
#धारावीपुनर्वसन #हर्षवर्धनसपकाळ #अदानीसमूह #भाजपसरकार #काँग्रेसआक्रमक #शेतकऱ्यांचीनुकसान #महाराष्ट्रराजकारण #KurlaLandDeal #DharaviProject #RatnagiriNews
????️ बातमी: रत्नागिरी वार्ताहर | www.ratnagirivartahar.in