रत्नागिरीकरांचा प्रश्न – आमच्या जिल्ह्यात अशी धडक कारवाई कधी होणार?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरीकरांचा प्रश्न – आमच्या जिल्ह्यात अशी धडक कारवाई कधी होणार?

 

सिंधुदुर्गात नितेश राणे यांची थेट मटका अड्ड्यावर धाड; मग रत्नागिरीत कधी होणार अशी कारवाई?

 

रत्नागिरी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट मटका अड्ड्यावर धाड टाकली आणि तब्बल ११ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे जनतेला दिलासा मिळाला. मात्र या कारवाईनंतर रत्नागिरीकरांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – “रत्नागिरीत अशी धडक कारवाई कधी होणार?”

 

रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक तालुक्यांमध्ये मटका, जुगार आणि अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. या अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून, तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत जात आहे. जनतेचे म्हणणे आहे की हे सर्व प्रशासनाच्या नजरेसूनही चालते आहे. मग रत्नागिरीतील पालकमंत्र्यांनी जनतेच्या हितासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी होत आहे.

 

सिंधुदुर्गातील धाड कारवाईने दाखवून दिले की इच्छाशक्ती असेल तर प्रशासनाला सावध करून नागरिकांना दिलासा देता येतो. आता रत्नागिरीतही अशीच ठोस कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

 

 

 

 

🔖 हॅशटॅग्स :

 

#रत्नागिरी #पालकमंत्री #अवैधधंदे #मटका #जुगार #RatnagiriPolice #RatnagiriVikas #खबरत्नागिरीची #भ्रष्टाचार #Maharashtra

 

📸

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...