महाअनिस नवी मुंबई शाखेच्या कवी संमेलनाला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कवितांच्या झोतात उजळला विज्ञानविचाराचा दीप

 

महाअनिस नवी मुंबई शाखेच्या कवी संमेलनाला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद

 

नवी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाअनिस नवी मुंबई जिल्हा आयोजित कवी संमेलन उत्साहाच्या, विविधतेच्या आणि विचारप्रकाशाच्या दिमाखात संपन्न झाले. अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित हे संमेलन ज्ञान विकास विद्यालय, कोपरखैरणे येथे रंगले. राज्यभरातील कवींचा मोठा सहभाग लाभल्याने हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय कवी मेळावा ठरला.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधव बावगे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड. खरगे, सार्थक सपकाळ, उपसंपादक राजेंद्र घरत, दत्ता आव्हाड, पत्रकार प्रथमेश गडकरी आणि आरती नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अशोक निकम यांनी पाण्यावर दिवा पेटवून दाखवलेल्या प्रभावी प्रयोगाने झाली—वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रकाश प्रत्यक्षात अनुभवायला लावणारा हा क्षण उपस्थितांना थक्क करून गेला.

 

प्रास्ताविक राजेंद्र पंडित यांनी केले. निवेदन प्रदीप कासुर्डे यांनी त्यांच्या ओजस्वी शैलीत रंगतदारपणे केले. त्यानंतर काव्यरत्नांची ओघवती मैफल रंगत गेली. विचारांची धार, भावना, सत्य-असत्याच्या चौकटी मोडून काढणारी भाषाशक्ती आणि माणुसकीचा शुद्ध नाद यांनी सभागृह भारावून गेले.

 

या कवीसंमेलनात डॉ. शैलजा करोडे, स्मिता तोरसकर, किशोरी पाटील, कल्पना म्हापुसकर, कल्पना देशमुख, नम्रता कांबळे, प्रिया कदम, निर्मला माने, सुरेखा पगारे, पल्लवी बांदोडकर, अरुण घोडेराव, डॉ. हरिभाऊ रणबावळे, मुरलीधर रणखांब, राहुल इंगोले, डॉ. सुभाष कटकधोंड, एकनाथ शेडगे, प्रल्हाद कसबेकर, गुरुदत्त वाकदेकर, अशोक सुकाळे, गिरीश भट, सुरेश लोहार, विनोद बांदोडकर, लिलाधर महाजन, अशोक भवार, दत्तू नाईकवाडे, अशोक नागकिर्ती, रुपचंद शिदोरे, विलास आडसुळे, महेंद्र पाटेकर, मंगेश रेडीज आणि नवनाथ घाडगे यांनी आपल्या काव्यकुंचल्यांनी विचारज्योतींना उजाळा दिला.

 

सर्व कवींनी सादर केलेल्या कवितांचे संकलन करून ‘काव्यज्योत’ या सुंदर ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले असून त्याचे संपादन कार्य प्रदीप कासुर्डे यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. प्रत्येक कवीला सन्मानपत्र आणि शब्दगुच्छ अर्थात पुस्तक देऊन गौरवण्यात आले—शब्दशक्तीला व विचारप्रबोधनाला दिलेला मान त्यातून जाणवून गेला.

 

या कार्यक्रमात नवी मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्ते पी. ए. पठारे, गजानन जाधव, उत्तम रोकडे, दिपरत्न सुरडकर, निवास पडळकर, निरंजन थोरात, सीमा सुरडकर, सीमा कांबळे, किरण वाळुंज आणि पवन कोकाटे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

 

शेवटी ‘हम होंगे कामयाब’ या प्रेरणादायी गीताने या ज्ञानयज्ञाची सांगता झाली—आशेचा दिवा, विवेकाची ज्योत आणि कवितेचा सुगंध मनात रुजवून. या गीताने उपस्थितांना एका मुक संकल्पाची जाणीव करून दिली—विवेकाची चळवळ अधिक बळकट करण्याची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवण्याची.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार : वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेवकांची...
Read More
सार्वजनिक आरोग्य विभागात ८ हजार पदांची भरती; राज्यभर ‘बाळासाहेब ठाकरे लोककल्याण अभियान’ राबवणार

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू