रत्नागिरी भूषण पुरस्काराने दिशा महाराष्ट्राची या वाहिनीचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर सन्मानित
आबलोली (संदेश कदम)
विविध क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटवणारे, साहित्यिक, सामाजिक व्यक्तीमत्व, दिशा महाराष्ट्राची या युट्युब तसेच वेब पोर्टल चे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांना ‘रत्नागिरी भूषण’ पुरस्काराने संगमेश्वर येथे सन्मानित करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिला गावांच्या विकासाला गती देणारा उत्सव म्हणजेच कुणबी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. सुहास खंडागळे तसेच उदय गोताड हे होते. मुख्य निमंत्रक म्हणून मुझम्मील काझी, सुनील खंडागळे तसेच नितीन गोताड होते. करंबेले तर्फे देवळे, गोताडवाडी, ता. संगमेश्वर येथे सदर कार्यक्रम दि. १३ व १४ डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने श्री. तुषार नेवरेकर यांना “रत्नागिरी भूषण २०२५” हा पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी दिशा महाराष्ट्राची वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक तुषार नेवकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, रत्नागिरी भूषण पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार मला ज्यांनी आत्तापर्यंत मदत केलेल्या, मार्गदर्शन केलेल्या ज्ञात, अज्ञात व्यक्तिमत्त्वांचा आहे. हा पुरस्कार मिळाल्यामुळे समाजात अजून विविध क्षेत्रात काम करण्याची मला नक्कीच प्रेरणा प्राप्त झाली आहे. पुढील अनेक वर्ष आपण सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, पत्रकार आदी. क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम राबवून नवोदिकांना, त्यांच्या कामांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत राहणार असल्याचे तुषार नेवरेकर यांनी आवर्जून सांगितले
तुषार नेवरेकर यांना मिळालेल्या रत्नागिरी भूषण पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचेवर विविध राजकीय, धार्मिक, सामाजिक संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी यूट्यूबर रिल्स्टार कोकणी निखिल म्हणजेच निखिल सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, तसेच गावकर राजेश गोताड,माजी पोलिस पाटील रामचंद्र धावडे, कृषितज्ज्ञ राहुल यादव, बुधाजी खंडागळे,आयोजक सुहास खंडागळे, उदय गोताड,मंगेश धावडे, श्यामकर्ण भोपळकर, सुरेंद्र काब्दुले, डॉ.मंगेश कांगणे,अमित गमरे,नितीन गोताड, सतेज जाधव, अनघा कांगणे, ईश्वरी यादव, स्थानिक ग्रामस्थ, महिला आणि तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.















