कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, उमराठ आयोजित “नमन” कार्यक्रमास साहित्यसंघ येथे रसिकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद .

मुंबई – संदीप शेमणकर
गुहागर तालुक्यातील मौजे उमराठ गावातील कोंडवी वाडी येथील ग्रामीण मूलभूत गरजा आणि आर्थिक निधीची उपलब्धता व्हावी वाडीच्या विकासाला चालना मिळावी या उद्देशाने कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ (रजि.) , उमराठ यांच्या वतीने रविवार दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दु. ४ वा. साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे कोकणची अस्सल लोककला अर्थातच श्री नवलाई देवी नमन मंडळ उमराठ यांच्या सहयोगाने बहुरंगी नमनाचा कार्यक्रम करण्यात आला, त्या प्रयोगास नमन रसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन सदर कार्यक्रम हाऊसफुल्ल केला. या कार्यक्रमाला, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, नमन नाट्य रसिक उपस्थीत राहून उत्तम प्रतिसाद दिला, संपूर्ण कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून विशेष कौतुक होत आहे.
सदर नमन, कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळाने सादर केले, त्यात वाडीतील उच्चशिक्षित पुरुष, पदवीधर , पदवित्तर, मॅनेजर, शिक्षक, CA अशा विविध प्रोफेशनल पदावर असणाऱ्या कलाकारांनी काम करून, आपली कोकणची पारंपरिक लोककला “नमन” मुळ स्वरूपात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
. वैभव धनावडे यांच्या सुंदर अशा गौळण लेखणीने आणि गोड गळ्याचे गायक योगेश गावणंग यांच्या सुमधुर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना मोलाची साथ गायक श्री. संदेश धनावडे यांनी दिली. सर्व कलाकारांनी जीव ओतून काम करून गौळण सुरेख आणि रंगतदार बनवली, यात कृष्ण, राधा, गवळणी आणि मावशी, सुदामा, पेंद्या, लंगड्या यांनी विनोदाची आतषबाजी करत अजून रंगत वाढवली.
मध्यंतरानंतर मंगेश गावणंग लिखित ‘लास्ट ईस्टॉप कोकण’ हे कोकणातील सध्यस्थितीवर भाष्य करणारे, विनोदी तसेच समाज प्रबोधन करणारे फार्स ने तर धम्माल उडवून दिली. फार्स मधील विनोदी संवाद, प्रसंग, जमिनी न विकण्याचे आणि व्यसनाच्या आहारी न जाण्याचे , कोकण जपण्याचे मोलाचे संदेश रसिकांना विशेष भावले.
या नमनाचे दिग्दर्शन वैभव धनावडे, गीतकार व गायन योगेश गावणंग, संगीतकार : संदेश आंबेकर, अक्षय नावले, कुंदन साळवी, नृत्यदिग्दर्शक गणेश पुजारी, सुत्रधार मनोज गावणंग तर निर्मिती कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ यांची होती.
या नमनात नवलाई देवीचे पारंपरिक खेळे, नाविण्यपूर्ण “गण-गौळण”आणि फार्स लास्ट ईस्टॉप कोकण, असा संपूर्ण कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना खास पर्वणीच ठरला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोंडवी वाडीतील सर्व मुंबईतील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्ते, स्थानिक कार्यकर्ते आणि उमराठ गावातील सर्व स्थानिक आणि मुंबईतील कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
कोंडवी वाडी उत्कर्ष मंडळ, हे विविध सामाजिक, प्रबोधनपर नाटके व दर्जेदार नमन सादर करणारे मंडळ म्हणून ओळखले जाते. त्यांची ही लोकप्रियता पाहून रसिकांनी प्रचंड गर्दी करून हा कार्यक्रम हाऊसफुल्ल आणि यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.













