रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना पाली येथे आला हृदयविकाराचा झटका; उद्या मूळ गावी अंत्यसंस्कार

 

बातमी :

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. कोल्हापूरहून रत्नागिरीकडे येत असताना पाली येथे त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय, सामाजिक आणि कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली.

 

राजेश सावंत यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्यासाठी सातत्याने काम केले. कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा, स्पष्टवक्तेपणा आणि प्रभावी संघटन कौशल्य यामुळे त्यांनी पक्षात वेगळी ओळख निर्माण केली होती.

 

त्यांच्या अकाली निधनामुळे भाजपसह संपूर्ण राजकीय क्षेत्राने एक अभ्यासू, संयमी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेतृत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत असून सावंत कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

 

राजेश सावंत यांच्यावर गुरुवारी त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें