
टीबी मुक्त ग्रुप ग्रामपंचायत निवेली यांचा जिल्हा परिषदे कडून रत्नागिरी येथे सत्कार.
राजापूर -(दिनेश कुवेसकर)- राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत निवेली यांचा रत्नागिरी जिल्हा परिषद येथे टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारत सरकारने सन 2025 अखेर देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवले होते याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षय रोगाच्या निगडित निराकरण करणे व क्षयरोग दुरीकरणासाठी पंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टीव्ही मुक्त पंचायत उपक्रमाचे ध्येय ठेवले होते माननीय डॉक्टर राजेंद्र जोशी डीडी जी सेंट्रल डिव्हिजन यांच्या पत्रानुसार महाराष्ट्रात म्हणून पात्र ठरविण्यात आले होते यामध्ये निवेली ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत म्हणून यांची निवड करण्यात आली होती यावेळी निवेली ग्रामपंचायत सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर ग्रामसेवक सचिन हातनकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याचे सर्व श्रेय आरोग्य केंद्र जानंशी मधील आरोग्य सेविका माळी मॅडम दिल जात यांचे यांचे विशेष आभार ग्रामस्थांनी मांडले आहेत सर्व परिसरातील ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हे ही वाचा👇
रत्नागिरी जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त….
सेंट्रल टीबी डिव्हीजन, यांच्या मार्गदर्शक सुचनानूसार महाराष्ट्रात २२५० ग्रामपंचायतींना पात्र ठरविण्यात आलेले आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतपैकी ४२ ग्रामपंचायती टी.बी. मुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तरी केंद्रीय स्तरावरुन प्राप्त पत्रातील मार्गदर्शक सुचनानुसार नमूद ग्रामपंचायतींना मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते आज छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे महात्मा गांधींच्या पुतळा स्मृती चिन्हासह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.यासोबत आरोग्याचे विविध कार्यक्रम व योजनांच्या माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी क्षयरोगा बद्दल सखोल माहिती देऊन गौरावपात्र ग्रामपंचायतीचे कौतुक केले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सेंट्रल टीबी डिव्हीजन, भारत सरकारने सन २०२५ अखेर देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्यांचे निराकरण करणे व क्षयरोग दुरीकरणासाठी पंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण करणे व त्यांच्या योगदानाचे जाहीर कौतुक करणे हे टी.बी मुक्त पंचायत उपक्रमाचे ध्येय आहे.सदर कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश सिरसाट, व्यवस्थापक फिनोलेक्स कंपनी श्रीदत्त अलगुर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे व जिल्हा क्षयरोग केंद्र रत्नागिरीचे कर्मचारी उपस्थित होते.

Author: Dinesh Kuveskar
दिनेश कुवेस्कर - राजापूर, रत्नागिरी वार्ताहर, डिजिटल मिडिया वार्ताहर.