अर्ज दाखल करताना जास्त वाहने आणि जास्त गर्दी नको .

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज दाखल करताना जास्त वाहने आणि जास्त गर्दी नको .

रत्नागिरी – निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली आहेत.

तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश एम. देवेंदर सिंह यांनी लागू केले आहेत.

Sujit Surve
Author: Sujit Surve

Sujit surve * Ratnagiri vartahar* Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...