जरांगें पाटील समर्थक गणेश अरुण कदम यांनी डोंबिवली मधून उमेदवारी अर्ज मागे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जरांगें पाटील समर्थक गणेश अरुण कदम यांनी डोंबिवली मधून उमेदवारी अर्ज मागे का?घेतला..!

पत्रकारांशी केला खुलासा

आबलोली (संदेश कदम)

गेल्या लोकसभेला महायुतीला जरांगें फॅक्टर चांगलाच महागात पडल्याने विधानसभेला जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या महायुतीच्या मित्रपक्षांची घोर निराशा झाली आहे याचं कारणही तसं आहे याबाबत पत्रकारांशी खुलासा केला आहे.

 

याबाबत डोंबिवली मधील जरांगे पाटील समर्थक उमेदवार गणेश कदम पत्रकारांशी खुलासा करताना म्हणाले की,त्याचं झालं असं, जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे केले तर महायुतीवर विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या मराठा समाजाची मतं महाविकास आघाडी आणि मराठा उमेदवार यांच्यात विभागली जाऊन युतीचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येण्याची शक्यता राजकीय अभ्यासक यांनी वर्तवल्याने लागलीच भाजपाने IT सेलच्या माध्यमातून जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे करावे म्हणून मराठा समाजाला डिवचण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही आहे.

 

कोणी आव्हान केल्यावर लगेच स्वीकार करणारा समाज अशी ख्याती असल्याने समाजाने पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला व पाटील यांनीही समाजाच्या भावना लक्षात घेऊन सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे फर्मान सोडून सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले.

 

पण पुढे झालं असं जरांगें यांच्या प्रामाणिक आणि रोखठोक भूमिकेमुळे करोडो समाज एकत्र आला खरा पण त्यात संघटनात्मक बांधणी नसल्याने एकएका मतदारसंघातून 20/25 इच्छुक उमेदवार तयार झाले, आता एवढ्या लोकांची मनधरणी करून एका मतदार संघात एक उमेदवार देणं हे गणित किती किचकट आहे, शिवाय एका समाजाच्या मतांवर किती उमेदवार निवडून येणं शक्य आहे याचा गांभीर्याने विचार केल्यावर मोठ्या संघर्षातून एक झालेला करोडो मराठा समाज एकत्र राहावा म्हणून एकही उमेदवार उभा न करण्याचा धाडसी निर्णय जरांगें यांनी घेतला व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काही तास शिल्लक असताना सर्वांना अर्ज मागे घेण्यास सांगून जरांगेंनी भर दिवाळीत महायुतीवर जणू काही राजकीय बॉम्बच टाकल्याने सर्वांचं गणित कोलमंडलं.

 

माताभगिनींवर झालेला लाठीचार्ज, त्यांचं सांडलेलं रक्त, कारण नसताना पाटील यांच्यामागे लावलेली SIT, वाशीला दिलेलं आश्वासन, आंदोलकांवरील गुन्हे कायम ठेवणं यासर्वामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका बजावल्याने बीजेपीचा सुपडा साफ करण्यासाठी लढणं नाही तर पाडणं ही भूमिका योग्य असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाटील यांच्यासोबत कायम असल्याचे मतं गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam