कोकणात वानर / माकडांच्या कळपांचा धुडगूस,कोकणाला वाली कोण? श्री.यशवंत जड्यार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

Credit

वानर / माकडांच्या त्रासाने शेतकऱ्यांनी शेती सोडली,अशीच परिस्थिती राहीली तर कोकणातील गावांचे वृद्धाश्रम नक्की

तळवली (मंगेश जाधव).
२५ वर्षापुर्वी कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्हामध्ये मोठया प्रमाणात भातशेती केली जात होती.कालांतराने येथे वानरांचे प्रमाण वाढत गेले आणि भातशेती / बागायती शेती ओस पडत गेली परिणामी कोकणातील तरूण / तरूणी नोकरी / व्यवसायाच्या शोधात मुंबईकडे वळल्याने गावे वृद्धाश्रम होत गेली आहेत.

वानरांच्या त्रासामुळे कोकणातील भात,नाचणी,वरी,कुळीथ,तुर या पारंपारीक नगदी पिकांची नासाडी होऊ लागली तर फळांचा राजा हापूस आंबा,फणस,काजू,नारळ,सुपारी,रातांबा,पेरू,चिकू ह्या कमरशिअल पिकांचे अतोनत नुकसान होऊ लागले आहे.शेवगा,भेंडी,गवार,गोंडा ( झेंडूची फूले ), पालेभाज्या,काकडी,पडवळ,दोडके,चिबूड यांना वानर वेलासकटच खात असल्याने शेतकऱ्यांनी जवळपास यांची लागवड करणेच सोडून दिले आहे.तर बांबू ( कोंडा ) ही वनस्पती माकडांनी कोकणातून जवळपास नामशेष केली आहे.

कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे आजही वडीलोपार्जित शेतयुक्त जमिन आहे,मुबलक पाणी आहे,माणसही आहेत,बैलजोडी आहे मात्र तरीही वानरांच्या त्रासामुळे शेती सोडलेली आहे.याला जबाबदार कोण?

आजपर्यंत कोकणातील अनेक नेते आमदार,खासदार आणि कॅबिनेट मंत्री झालेत,मात्र वृद्धाश्रम झालेल्या यांच्या मतदार संघातील हया मोठया समस्येकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही,कोकणात गेली ७५ वर्ष रस्ते व पाणी यावरच निवडणूका लढवल्या गेल्या,पण रोजगाराचे काय?

मागील काही वर्षापासून रत्नागिरीतून श्री.अविनाश काळे ह्या शेतकऱ्यांने यासंदर्भात मोठे रान उठवले होते,मात्र निवडणूका जवळ आल्या की मंत्रीमहोदय चार वानर पिंजऱ्यामध्ये पकडतात आणि पुढील सहा महीने त्याच्या बातम्या पेरत राहतात.पुन्हा परिस्थिती जैयच्या थै.

*हापूस आंबा* : कोकणातील रत्नागिरी आणि देवगडचा हापूस आंबा हा जगप्रसिद्ध आहे.बागायतदार दरवर्षी कलमांना खत घालणे,औषधांची फवारणी करणे,गवत काढणे,साफसपाई,बागेचे कुंपण,राखनदार गडी यासाठी लाखो रूपये खर्च करतात आणि मार्च / एप्रिलच्या दरम्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी घास आला की मोठा वानर / माकडांचा कळप बागेत येतो आणि काही आंबे खातो तर काही कलमांच्या झाडांवर उड्या मारून फळे खाली पाडून जातो,पुढे वानरांचा हा नित्यक्रमच होतो.शिवाय हापूसला हवी भाव नाही.त्यात अवकाळी येणारा पाऊस याच्याने कोकणातील शेतकरी पूर्णता हवालदिल झालाय.हिच परिस्थिती फणस,नारळ,सुपारी,रातांबा यांची मग कोकणातील शेतकऱ्यांने शेती कशी करायची?

२५ वर्षापुर्वी कोकण शेतीपुरक असल्याने साधारण घरातील एका मुंबईकर चाकरमन्याच्या मनिऑर्डरवर गावातील पूर्ण परिवार चालत होते पण आज ह्या वानरांच्या त्रासामुळे गावाची परिस्थिती बरोबर उलटी झालेली आहे.गावात २ म्हातारा म्हातारी आणि पूर्ण परिवार मुंबईत.परिणामी कोकणातील जिल्हा परिषद शाळा पटाविना बंद पडायला लागल्यात,त्यातूनच एखादा तरूण गावाला शेतीसाठी राहीलाच तर त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही,मुलीचे नातेवाईक विचारतात शेतीचे उत्पन्न किती?ही आहे वानराची करामत.

वानर हा प्राणी फक्त शेतीचेच नुकसान करतोय असे नाही तर लोकांच्या घराची कौले व पत्रे फोडतो आणि घरात घुसून प्रसंगी धान्य व बनवलेले जेवणही खातो.

कोकणात आज वानरांच्या त्रासाने शेतकऱ्यांनी पारंपारीक शेती सोडलीय,येथे रोजगार लपलब्ध नसल्याने तरूण तरूणी मुंबईची वाट धरत आहेत,भविष्यातही अशीच परिस्थिती राहिली तर कोकणाची अवस्था खूप बिकट आहे.

त्यामुळे महाराष्ट्र शासनाने वानर / माकड यांना उपद्रव्य प्राणी म्हणून घोषित करावे,त्यांना पकडून लांब अभयारण्यांत सोडावे किंवा त्यांची नसबंदी तरी करावी.अन्यथा कोकण सामुदायिक वृद्धाश्रम झाल्याशिवाय राहणार नाही.

आपला स्नेहांकित :*
*श्री.यशवंत जडयार*
सामाजिक कार्यकर्ते राजापूर / मुंबई
मो.9270537178 Wh. 8698194851

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

📰 ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर 🎬 रितेश देशमुख दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपटाची जोरदार...
Read More
‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दणका; 88.85 कोटींची कमाई, 100 कोटी क्लबच्या उंबरठ्यावर

‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

📰 ‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार 📍 राज्यातील सर्व विभाग, कार्यालये आणि महामंडळे एकाच...
Read More
‘चांद्यापासून बांद्या’पर्यंत माहिती एका क्लिकवर! माहिती अधिकार ऑनलाईन पोर्टलची व्याप्ती वाढणार

महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

📰 महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे 📍 देवरुख येथे “छत्रपती शिवाजी महाराज...
Read More
महसूल सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध – अपर मुख्य सचिव विकास खारगे

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा
shivam