छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून बहुरूपी कला जिवंत आहे – रावसाहेब लिंबाजी शिंदे
आबलोली (संदेश कदम) …..
संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बहुरूपी हि कला, आपली परंपरा सर्व जनते समोर दाखल केली जायची शिवाजी महाराज यांच्या छत्रपती काळापासून बहिर्जी नाईक,उमाजी नाईक हे गुप्तहेर दुश्मनांच्या गोठात जाऊन तेथील माहिती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना बातम्या देत होते आणि त्या बातम्यां वरुनच छत्रपती शिवाजी महाराज हे आपली पुढील रणनिती ठरवत असत बहुरूपी कला हि आपल्या महाराष्ट्र राज्याची परंपरा आहे आणि हि परंपरा आंम्ही जोपासत असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजपर्यंत बहुरूपी हि कला जिवंत आहे असे स्पष्ट मत बहुरूपी साहेबराव लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे रा. भुम, ता. जि. उस्मानाबाद यांनी आबलोली येथील आशिष भोसले यांच्या साई पुजा हेअर आर्टस् व आर. एन. अगरबत्ती सेंटर आबलोली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले
बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे पुढे म्हणाले की, बहूरूपी हा टिकला पाहिजे आणि त्यासाठी समाजानेही बहूरूपीचा सन्मान केला पाहिजे जसे आंम्ही बहूरूपी आपली विनोदी भाषा जनतेला समजवून सांगत असतो त्यामुळे जनतेला समाधान वाटते. बहूरूपी हि आमची परंपरा आहे त्यामुळे आंम्ही जनतेला हसवतो त्यामुळे जनतेला बरे वाटते. बहूरूपी हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून ५०० वर्षापूर्वीच्या पिढी पासून आपल्या जनतेकडे जातात आणि सर्वांना खुष करतात, हसवतात
जी विनोदी भाषा बोलून तुंम्ही जनतेला हसवताखुष करता ती भाषा आमच्या सोबत बोला? असा पत्रकारांनी प्रश्न केला असता बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे विनोदी भाषेत बोलताना म्हणाले की, आज आमच्या सास-यांचे लग्न आहे सर्व लोक झालेत, गेले, अन् सर्व लोक निगले आणि गाडी खाली जाऊन बसले. साहेब म्हणे लग्न आहे सास-याच वड्यामधी म्हणजे वड्यामधी नाही. राजकारण राजवाड्यात सर्व लोक आले आणि गाडीखाली जाऊन बसले. चला काकू चला..! कुत्री घ्या काकला अन् पोरं बांधा खांबाला लुगु लुगु पळा चिखल बघुन लोळा, चिखल गेला डोळ्यात बसा पाटलाच्या मळ्यात, लाडूच टोपलं साहेबाच्या गळ्यात, मिठाचे लाडू खावा मिठाचे लाडू खावा झाले समाधान झाले समाधान हसले.., हसले..! बहूरूपी कलेकडे शासन कोणत्या नजरेने पहाते असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शासन बहूरूपी कलेकडे चांगल्या नजरेने बघीत असून बहूरूपी कलाकारांना महाराष्ट्रात वयस्कर, वया प्रमाणे झाल्यानंतर म्हणजे शासकीय नोंदणी प्रमाणे ज्या – ज्या बहूरूपींचे ५५ वर्ष झाल्यानंतर शासन आंम्हाला दोन हजार रुपये मानधन देते परंतू पंचायत समिती एक, दोन महिने हे मानधन थांबतात परंतू एक, दोन महिन्यानंतर हे मानधन आंम्हाला भेटते त्याबद्दल शासनाला धन्यवाद देतो असेही बहुरूपी रावसाहेब लिंबाजी शिंदे तथा एस. एल. शिंदे यांनी सांगितले
???? Plz संपूर्ण बातमी आमच्या RV News या यूट्यूब वर पहा ???? ????
.https://youtu.be/LIqCF2etd2U?si=QQ8BVLu_OW3ZuQMq















