राज्य महीला आयोगाचा रत्नागिरी दौरा!,महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत,महिला
महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत,महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर महाराष्ट्र दौरा करत आहेत.
रत्नागिरी – राज्य महीला आयोगाचा रत्नागिरी दौरा!,महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत,महिलाया दौऱ्याची सुरुवात त्यांनी रत्नागिरीतून केली जिल्हा नियोजन सभागृहा मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जनरल सुनावणी घेण्यात आली.
राज्य महिला आयोगा कडील अहवालानुसार, रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी सुरक्षित असल्याने त्यांनी प्रशासनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.वैयक्तिक, कौटुंबिक,सामाजिक मालमत्ता,आर्थिक, कामाच्या ठिकाणी होणारा छळ,लैंगिक छळ आणि इतर अशा एकूण 108 तक्रारींवर जनसुनावणी आयोजित केली होती.या तक्रारीत हुंडाबळीची एकही केस जिल्ह्यामध्ये आढळून आले नाही.
राज्य महीला आयोगाचा रत्नागिरी दौरा!,महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत,

यानंतर पत्रकार परिषदेमध्ये निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कारनामे आणि त्यांच्यावर प्रशासनाकडून न होणारी कारवाई याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता,.
या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत घेतली त्यांच्यावर कारवाई झाल्याचे आपल्याला नक्की पाहायला मिळेल असे आश्वासन रूपाली चाकणकर यांनी पत्रकारांना दिले असून, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह सुद्धा अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे बडगा उगारणार असल्याचे बोलले जात आहे.















