विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज : पंचायत समिती माजी सदस्य विवेक सुर्वे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज : पंचायत समिती माजी सदस्य विवेक सुर्वे

वाटद येथे केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

 रत्नागिरी (प्रतिनिधी निलेश रहाटे)

रत्नागिरी – प्रत्येक राष्ट्राचा पाया हा विद्यार्थ्यांच्या स्वरूपात ग्रामीण भागातील व शहरी भागातील प्राथमिक शाळांमध्ये तयार होत असतो. त्या अनुषंगाने या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाच्या हिताच्या दृष्टीने विविध स्पर्धा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार असून या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे ही काळाची गरज असल्याचे मत पंचायत समिती रत्नागिरीचे माजी सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकजी सुर्वे यांनी व्यक्त केले.

ते रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्रातील केंद्रस्तरीय शिक्षणप्रेमी मंडळी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने असे वातावरण निर्माण होण्यास मदत होणार आहे. अशा स्पर्धांसाठी आणि शैक्षणिक कामासाठी माझा कायमचा पाठिंबा असणार असून, म्हणूनच अशा उपक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक संस्थांसाह समाजातील जाणकार मंडळींनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद केंद्राच्या सर्व शाळांमधील शिक्षणप्रेमी मंडळींनी केंद्रस्तरीय विद्यार्थी गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये वाचन, हस्ताक्षर, स्मरण, चित्रकला, स्तोत्र पाठांतर आणि प्रश्नमंजुषा या स्पर्धेचा समावेश होता. यासाठी इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी ते चौथी, इयत्ता पाचवी आणि इयत्ता सहावी ते सातवी असे गट निश्चित करण्यात आले होते.

स्पर्धेच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पवार यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी अनिल पवार यांनी उद्घाटनप्रसंगी या गुणवत्ताविषयक विविध स्पर्धांचे आयोजनांचे कौतुक करतानाच, ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गुणवत्ता असते. तिचा शोध घेणे आवश्यक असल्याने आणि तो शोध अशा स्पर्धांच्या माध्यमातून पूर्ण होतो म्हणून या स्पर्धा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच यावेळी या स्पर्धेच्या अध्यक्षा तथा शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांनीही या स्पर्धा योजनेचे कौतुक करतानाच ह्या स्पर्धा शिक्षण प्रेमी मंडळींनी आयोजित करण्यासाठी घेतलेला पुढाकार हा वेगवेगळ्या अभियानासाठी उपयुक्त ठरणारा असल्याचे सांगून पालक आणि ग्रामस्थ यांचे असेच सहकार्य शाळांना मिळत राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी केंद्रप्रमुख दिपक सुतार यांनी आपल्या मनोगतातून या स्पर्धेच्या उद्देश आणि स्वरूप सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, बाळशेठ जोग, दत्तात्रय बिवलकर, माजी सरपंच अनिकेत सुर्वे, संजय शितप, राम साठे, संजय चाळके, जयेश घवाळी, उदय महाकाळ, शरद सुर्वे, सुरेश धनावडे, यशवंत किंजळे, सुधाकर शिर्के, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे, सानिका पालये, संदीप भडसावळे, पारकर सिस्टर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्याना शुभेच्छा देतानाच या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.

दिवसभर चाललेल्या या स्पर्धांचे रत्नागिरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावर यांच्या प्रेरणेने आणि वाटद केंद्राचे केंद्रीयप्रमुख दीपक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद केंद्रातील शिक्षणप्रेमी मंडळींनी सर्व शाळांच्या अध्यक्षांच्या सहकार्याने आयोजन केले होते.

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उदय रहाटे, नितीन झगडे, शेखर भडसावळे, योगेश सागवेकर, राजेंद्र सुर्वे, सुहास पालये, माधव अंकळगे सर,अश्विनी पवार मॅडम ,शेखर सागवेकर सर,एकनाथ महाकाळ सर,श्रावणी नांदीवडेकर मॅडम,रमेश दुर्गवळी सर ,मनोहर इनामे सर,यांच्यासह वाटद केंद्रातील सर्व शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, सर्व शिक्षणप्रेमी मंडळी, पालक आणि शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.

या स्पर्धेत विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

???? आणखी बातम्या वाचण्यासाठी आमच्या HOME पेज ले क्लिक करा ????

Nilesh Rahate
Author: Nilesh Rahate

???? निलेश रहाटे ???? मिडिया प्रतिनिधि - रत्नागिरी वार्ताहर. ता. जिल्हा - रत्नागिरी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न