महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीने गरिबांना भोगावे लागतंय वाढीव वीज बीलाचे चटके
राजापूर -(प्रतिनीधी) आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ता. विलास राऊत यांनी महावितरण कार्यालय राजापूर. त्याच्याशी अनेक वेळा संपर्क केला असता.
अधिकारी वर्गाकडून कोणत्याही प्रकारचा समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याचा विलास राऊत यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे.
राजापूर तालुक्यातील फुपेरे गावातील पांडुरंग गणू भोवड यांना फटका बसलाय तो महावितरणच्या वाढीव विद्युत बीलाचा. मात्र कोकणातील गोरगरीब लोक कष्टकरी कधीही कोणत्याही प्रकारचे वीज बिल असेल पाणी बिल असेल न थकवता भरणारा विभाग म्हणजे कोकण. आणि याच विभागांतील लोकांवरती महावितरण कडून अन्याय करण्यात येतो हो वाढीव वीज बीला संदर्भात लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास कार्यालयाच्या बाहेर कपडे काढून आंदोलन करणार असल्याचं आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ता विलास राऊत यांनी इशारा दिला आहे.

Author: Samir Shirvadakar
🔴 समिर शिरवडकर 🔴 राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.