विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महाविक्रम, इंग्लंडविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महाविक्रम, इंग्लंडविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज!

 

 

IND vs ENG : विराट कोहलीने इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या वनडेमध्ये अर्धशतक झळकावत आपला फॉर्म परत मिळवला आहे. विराट कोहलीने ५५ चेंडूत ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावांची शानदार खेळी केली. विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पुन्हा आपल्या जुन्या अंदाजात परतला आहे, ही टीम इंडियासाठी चांगली गोष्ट आहे. विराट कोहलीने या अर्धशतकी खेळीमध्ये दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत.*

 

 

विराट कोहलीने या शतकी खेळीदरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. इंग्लंडविरूद्ध वनडेमध्ये त्याने ही कामगिरी आपल्या नावे केली. याशिवाय सर्वात कमी डावात १६ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो आशियातील फलंदाज ठरला आहे.

 

रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात १ धाव करून बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि शुबमन गिलने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने शुबमन गिलच्या साथीने आघाडी घेत १० षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. ११व्या षटकापर्यंत गिल आणि कोहली यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली. यानंतर दोघांनी वेगवान धावा करत भारताला १३ षटकांत ७९ धावांपर्यंत नेले. यादरम्यान कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

 

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १६ धावांचा टप्पा गाठून विराट कोहलीने इंग्लिश संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध ४००० धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर होता. सचिनने इंग्लंडविरुद्ध ३९९० धावा केल्या होत्या. आता विराट कोहली पुढे गेला आहे.

 

*आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू*

 

४००० – विराट कोहली*

३९९० – सचिन तेंडुलकर

२९९९ – एमएस धोनी

२९९३ – राहुल द्रविड

२९१९ – सुनील गावस्कर

२४६० – रोहित शर्मा

 

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४ हजार धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध ही मोठी कामगिरी केली होती.

 

विराट कोहलीने आपल्या अर्धशतकी खेळीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आशिया खंडात १६ हजार धावा पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला आहे. कोहलीने आपल्या ३४०व्या डावात ही कामगिरी केली आहे. तर सचिनने आशिया खंडात ३५३ डावात १६ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ३६० डावात हा विक्रम केला होता आणि श्रीलंकेचा आणखी एक दिग्गज महेला जयवर्धनेने ४०१ डावात हा विक्रम केला होता.

सौजन्य- सोशल मिडिया.

विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महाविक्रम, इंग्लंडविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज!

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के