विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या साहित्याचा अभ्यास करावा , सुषमा गायकवाड
गुहागर – विद्यार्थ्यांनी मराठी भाषेतील साहित्याचा सखोल अभ्यास करावा, व्याकरणाचे नियम समजावून घ्यावेत ,मराठी भाषेतील सौंदर्य उलगडावे ,मराठी शिवरायांची भाषा आहे ,शूर वीरांची शाहिरांची भाषा आहे असे प्रतिपादन वेलदूर नवानगर मराठी शाळेत संपन्न झालेल्या मराठी राजभाषा दिन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुषमा गायकवाड यांनी केले.
त्यावेळी मुख्याध्यापक डॉ मनोज पाटील ,शिक्षिका धन्वंतरी मोरे ,अफसाना मुल्ला ,अर्णवि नाटेकर ,संस्कार रोहीलकर , आर्या नाटेकर ,काव्या दाभोळकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर प्रेम व्यक्त करण्यासाठी विविध कवितांचे गायन तालासुरात केले.विद्यार्थ्यांसाठी कविता गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धन्वंतरी मोरे यांनी केले.















