📰 महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाचा रत्नागिरी दौरा
वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव समाजाच्या मागासवर्ग दर्जाबाबत सुनावणी व क्षेत्रपहाणी
रत्नागिरी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. डॉ. निलिमा सरप (लखाडे) आणि ज्योतिराम चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव या समाजगटांच्या मागासवर्ग दर्जाबाबत बैठक, सुनावणी आणि क्षेत्रपाहणी करणार आहेत.
आयोगाचे सदस्य सोमवार, 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात आगमन करून मुक्कामी थांबणार आहेत.
मंगळवार, 3 जून रोजी सकाळी 10 ते 11 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोगाचे सदस्य जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत. या बैठकीत संबंधित समाजगटांच्या मागासवर्ग दर्जाबाबत चर्चा होणार आहे.
यानंतर सकाळी 10 ते 12 दरम्यान या समाजगटांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद व सुनावणी होणार आहे. दुपारी भोजनानंतर, 1 ते 6 दरम्यान आयोग सदस्य रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत क्षेत्रपाहणी करणार आहेत. संध्याकाळी ते सिंधुदुर्गकडे रवाना होतील.
हा दौरा समाजगटांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे प्रत्यक्ष परीक्षण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
—
📌 #हॅशटॅग्स
#महाराष्ट्रमागासवर्गआयोग #रत्नागिरीदौरा #वैश्यवाणी #शैवगुरव #भाविकगुरव #घाडीगुरव #सामाजिकन्याय #BackwardClassCommission #RatnagiriNews #RatnagiriVartahar
—
📷 फोटो

Author: Sandesh Kadam
संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक