आ. हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवणार – भीमराज बागुल

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आ. हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवणार – भीमराज बागुल

 

श्रीरामपूर (नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी) – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टिळकनगर इंडस्ट्रीज या कारखान्याच्या संदर्भात विधानसभेमध्ये आमदार हेमंत ओगले यांनी केलेल्या कथित चुकीच्या वक्तव्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा) चे विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल यांनी आमदार ओगले यांना जाहीर इशारा दिला आहे की, “हेमंत ओगले यांना दिसेल तिथे काळे झेंडे दाखवण्यात येतील.”

 

भीमराज बागुल यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीरामपूर मतदारसंघातील आरक्षित जागेवर निवडून आलेले काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी नुकतेच राज्य विधानसभेत झालेल्या चर्चासत्रात टिळकनगर इंडस्ट्रीजविषयी अत्यंत गंभीर आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केले. त्यात त्यांनी असे म्हटले की, “टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दूषित पाणी मिळते, त्याचा शेतीवर विपरित परिणाम होतो, ते पाणी पिण्यायोग्य नाही आणि त्यामुळे जमिनीचा दर्जाही खालावला आहे. या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देताना बागुल यांनी म्हटले की, “हे वक्तव्य केवळ चुकीचेच नाही, तर टिळकनगर इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या हजार कामगारांच्या जीवनावर घाला घालणारे आहे. या कारखान्यातील कामगारांमध्ये या विधानामुळे तीव्र संताप निर्माण झाला असून अनेकांनी आमदार ओगले यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे.

 

बागुल पुढे म्हणाले, “टिळकनगर इंडस्ट्रीज ही गेली अनेक वर्षे श्रीरामपूर परिसरातील केवळ आर्थिक नाही तर सामाजिक स्थैर्याचा केंद्रबिंदू ठरली आहे. या कारखान्यामुळे हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह चालतो. हा कारखाना केवळ उद्योग नाही तर स्थानिकांसाठी रोजगाराचा मुख्य स्रोत आहे. आमदार ओगले यांनी या उद्योगाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करून कामगारांच्या जीवनावर संकट निर्माण केले आहे. रिपब्लिकन पार्टीच्या मते, कारखान्याकडून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठीही दररोज टँकरने स्वच्छ पाणी पोहोचवले जाते. त्या परिसरातील शेतजमिनीत चांगली शेतीही होते आणि तीथील शेतकरी समाधानी आहेत. “या भागात गेल्या तीन पिढ्यांपासून लोकांचा उदरनिर्वाह या कारखान्यावर आधारित आहे. आजवर कोणीही असा मुद्दा उपस्थित केला नाही. मग आमदार ओगले यांनीच अचानक हा विषय का उपस्थित केला?” असा सवालही बागुल यांनी केला आहे.

 

बागुल यांनी आमदार ओगले यांच्यावर टीका करत पुढे म्हटले की, “जेव्हा रोजगार निर्मिती करणे अपेक्षित आहे, त्यावेळी सध्याचे रोजगार बंद करण्याचा प्रयत्न होतो आहे. जर उद्या टिळकनगर इंडस्ट्रीज बंद पडली, तर त्या 1हजार कामगारांच्या पोटापाण्याची जबाबदारी ओगले घेणार आहेत का? का त्यांनी हा मुद्दा उचलून धरला यामागे राजकीय हेतू आहे का?”

 

या संपूर्ण प्रकरणावरून येणाऱ्या काळात श्रीरामपूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता बळावत आहे. बागुल यांनी सूचित केले की, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला गोरगरीब जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. “आमदार ओगले यांनी जनतेला रोजगारापासून वंचित करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी असून, त्याचा फटका काँग्रेसला भविष्यात भोगावा लागेल,” असेही बागुल यांनी स्पष्ट केले. शेवटी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घोषित केले आहे की आमदार हेमंत ओगले जिथे जिथे जनतेच्या समोर येतील, तिथे तिथे त्यांना काळे झेंडे दाखवले जातील आणि त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा