पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत नवभारत साक्षरता अभियान जनजागृती संपन्न.
गुहागर – (वार्ताहर) ; गुहागर पंचायत समिती शिक्षण विभाग मार्फत नवभारत साक्षरता अभियान जनजागृती श्री निळकंठेश्वर नवरात्री उत्सव मंडळ शृंगार तळी येथे करण्यात आली .पंचायत समिती गुहागरचे विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे ,पंचायत समितीचे कर्मचारी ,विद्यालयातील शिक्षक ,नागरिक मोठ्या संख्येने त्यावेळी उपस्थित होते .सदर कार्यक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग ,भारत सरकार ,नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई ,शिक्षण संचालनालय योजना तथा राज्य साक्षरता अभियान महाराष्ट्र राज्य पुणे, नव साक्षरता केंद्र, एस सी ई आर टी पुणे यांचे मार्फत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम सर्वांसाठी शिक्षण ही योजना सुरू आहे .सदर कार्यक्रमाचा उद्देश हा पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य ,व्यावसायिक जीवन कौशल्य विकास ,मूलभूत शिक्षण निरंतर शिक्षण असे असून याबाबत जनजागृती आली .सदर जनजागृती बाबत पालक व नागरिक यांच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून त्यांनी समाधान व्यक्त केले.















