मासेमारी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात.
Dinesh Kuveskar: राजापूर तालुक्यातील नाटे जैतापूर ते हातीवंले रस्त्यावर मच्छी वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडत आहेत जैतापूर नाटे हातिवले या रस्त्यावरून हलकी वाहने व मोटरसायकल बाईक स्वार यांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा वासाला सामोरे जावे लागत आहे.
मासेमारी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची मागणी, नागरिकांचं आरोग्य धोक्यात.
या दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्यामुळे पादचाऱ्यांना ही त्रासाला सामोरे जावे लागत आहे या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना सहन करावा लागत आहे तरी या दुर्गंधीयुक्त सोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक व पादचारी यांनी केली आहे

Author: Dinesh Kuveskar
दिनेश कुवेस्कर - राजापूर, रत्नागिरी वार्ताहर, डिजिटल मिडिया वार्ताहर.