अचानक पणे वनव्यामुळे लागलेल्या आगीत रूण पराडकरवाडी येथील शेतकऱ्यांची 150 काजू कलमे आणि गवताची वरंडी जळून खाक..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वनव्यामुळे काजूची झाडे भस्मसात, 150 गवताच्या वरंडी देखील जळून खाक.

लांजा (जितेंद्र चव्हाण- वार्ताहर)  लांजा तालुक्यातील रूण, अचानक पणे वनव्यामुळे लागलेल्या आगीत रूण पराडकरवाडी येथील शेतकऱ्यांची 150 काजू कलमे त्याचप्रमाणे गवताच्या वरंडी जळून खाक झाल्या. इतर दोन शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे ही घटना रूण- बापरे गावच्या सीमेवर घडली आहे.

सदरची घटना 3 फेब्रुवारी घडली आहे. यामध्ये रूण- बापरे गावच्या सीमेवर असलेल्या रामचंद्र सुर्वे यांच्या काजूच्या बागेत अचानकपणे वनव्यामुळे आग लागली. सदर आगीमध्ये त्यांची 150 काजूची धरती कलमे जळून नुकसान झाले आहेत. त्याचबरोबर शेतात गुरांना खाण्यासाठी ठेवलेल्या 150 गवतांच्या वरंडी देखील जळून खाक झाले आहेत. त्यामुळे सुर्वे यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर रामचंद्र सुर्वे यांचे लगतच्या नामदेव कृष्णा पराडकर यांचे आणि सुभाष वालम (बापरे) यांचे देखील वनव्यामुळे नुकसान झाले आहे.

  या घटनेचा पंचनामा आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी करण्यात आला.

तिन्हीही शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीचा पंचनामा 6 फेब्रुवारी रोजी चार चे सुमारास करण्यात आला. पंचनामा करतेवेळी साटवली ग्राम विकास अधिकारी श्री, अजित पाटील, कृषी सहाय्यक जयश्री जाते मॅडम, पोलीस पाटील सदानंद किल्लेकर, रूण सरपंच साखरकर, उपसरपंच रमेश जाधव, स्थानिक शेतकरी प्रकाश शेठ गोरे, शेतकरी नामदेव पराडकर उपस्थित होते.

या घटनेतील शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून आपणास योग्य ती नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]