अमर सुवर्ण महोत्सव म्हणजे २०२५ चा आनंदोत्सव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अमर सुवर्ण महोत्सव म्हणजे २०२५ चा आनंदोत्सव


राजापूर – संदीप शेमणकर
अमर विकास मंडळ (रजि), पूर्व मारवेलवाडी, धाउलवल्ली, ता. राजापूर, जि. रत्नागिरी, यांनी ५० व्या वर्षानिमित्त २०,२१ आणि २२ मार्च २०२५ असा तीन दिवस आयोजित केलेला सुवर्ण महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित जिल्ह्यात प्रथमच होणारा आपला व्यवसाय, आपले व्यासपीठ हा ऐतिहासिक सोहळा तसेच भव्य फ्री मेगा लकी ड्रॉ बहुरंगी नमन अशा कार्यक्रमानी विशेषतः प्रेक्षकांची मने जिंकली. संपूर्ण पंचक्रोशीतून उपस्थित १०० प्लस व्यावसायिक व २००० प्लस जनता हे या सोहळ्यांचे मुख्य आकर्षण ठरले.
हा अमर सुवर्ण महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यामागे मंडळाप्रमाणेच असंख्य जेनतेचे देखील तेवढेच मोलाचे सहकार्य लाभले आणि भविष्यात ही ते सदोदित लाभत राहो असे या मंडळाचे म्हणणे आहे. सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद देण्यात आले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]