कोतळूक येथील मोरी खचली; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर सचिन ओक यांचा सवाल!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

????️ कोतळूक येथील मोरी खचली; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर सचिन ओक यांचा सवाल!

पावसाळा तोंडावर, जीवितहानीची भीती वाढली; “आपत्ती आली कीच प्रशासन जागं होणार का?” – कोतळूक ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांचा संतप्त सवाल

आबलोली (संदेश कदम) –

गुहागर तालुक्यातील कोतळूक गावात ‘गणपतीच्या पऱ्या’ या ठिकाणी असलेल्या मोरीचा काही भाग पुन्हा खचला आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यात अचानक खड्डा पडल्याने वाहनचालकांना तो दिसत नाही, परिणामी अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. जीवितहानी झाली की प्रशासन जागे होणार काय? असा थेट सवाल ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक यांनी उपस्थित केला आहे.

सचिन ओक यांनी सांगितले की, “अंजनवेल-रानवी-शृंगारतळी-आबलोली-रत्नागिरी या राज्य मार्गावरील कोतळूक गावातील ही मोरी ऑक्टोबर २०२४ मध्येच खचली होती. मी त्यावेळी गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तात्काळ पाठपुरावा केला. त्यामुळे तात्पुरती डागडुजी झाली मात्र नव्या मोरीचे काम झालेच नाही.”

जानेवारी २०२५ मध्ये केवळ डांबरीकरण करून विभागाने आपली जबाबदारी संपवली, अशी स्पष्ट टीका ओक यांनी केली. यानंतर त्यांनी वारंवार भेटी देऊन नव्या मोरीचे काम लवकरात लवकर करण्याची विनंती केली, मात्र केवळ तोंडी आश्वासनच मिळाले.

कोतळूक ग्रामपंचायतीनेही यासंदर्भात बांधकाम विभागाला पत्र पाठवले, परंतु तेही दुर्लक्षित केले गेले. “विभाग आणि ठेकेदार यांच्यातील ‘संरक्षण’च आता या गंभीर परिस्थितीला कारणीभूत ठरत आहे,” असा गंभीर आरोप ओक यांनी केला आहे.

“आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदारांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

 

???? हॅशटॅग्स:

#कोतळूक #गुहागर #मोरीखचली #सचिनओक #बांधकामविभाग #RatnagiriNews #PublicWorks #InfrastructureNeglect #GanpatiPara

 

 

???? फोटो

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]