“वर्ल्ड फॉर नेचर इंडिया”या संस्थेतर्फे पुरस्कारांसाठी 5 नोव्हेंबर 2025पर्यंत नामांकने दाखल करण्याचे आवाहन
आबलोली (संदेश कदम)
निसर्ग संवर्धन व वन्यजीवांसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या सामाजिक संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेला यावर्षी 5 वर्ष पूर्ण होऊन 6 व्या वर्षात पदार्पण करीत असून या निमित्ताने “वर्ल्ड फॉर नेचर इंडिया” या संस्थेचा पहिलाच “निसर्ग मित्र मेळावा” व पहिला “राज्यस्तरीय सन्मान सोहळा 2025 ” या मित्र मेळावा व सन्मान सोहळ्याचे आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला
असून समाजातील तळागाळातील व्यक्तींचा योग्य सन्मान व्हावा हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना योग्य मान सन्मान मिळावा यासाठी वन्यजीव, पर्यावरण, सामाजिक शैक्षणिक, साहित्य, पत्रकारिता,सांस्कृतिक तसेच कृषी सारख्या अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून त्यासाठी दिनांक 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत विविध पुरस्कारांसाठी 1000/- रुपये ( एक हजार रुपये ) प्रवेश शुल्कासह अर्ज दाखल करावा नामांकनासाठी मो. नं.9356118438/9527415560 या नंबरवर संपर्क साधावा असे जाहीर आवाहन वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखा या संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आले आहे.
वन्यजीव, निसर्ग संवर्धन पर्यावरण क्षेत्रासाठी 1) सह्याद्री रत्न निलेश बापट आदर्श वन्यजीव रक्षक पुरस्कार 2025
2) वर्ल्ड फॉर नेचर आदर्श निसर्ग सेवक पुरस्कार 2025 तसेच शैक्षणिक व इतर क्षेत्रांसाठी
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार 2025
2) राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार 2025
3) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार 2025
4) राज्यस्तरीय युवा रत्न पुरस्कार 2025
5) राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार 2025
6) राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार 2025
7) राज्यस्तरीय आदर्श प्रगतशील शेतकरी पुरस्कार 2025
8) राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना 2025 अशा विविध पुरस्कारांनी अमित क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि सामाजिक संघटनांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे स्वरूप – शाळ, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ तसेच समारंभासाठी उपस्थित सर्वांना सकाळी चहा नाष्टा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा संस्थेच्या वतीने देण्यात येणार आहे. या पुरस्कारांची निवड ही पाच जणांची समिती करणार असून करत असलेल्या क्षेत्रातील कामांचे मूल्यांकन करून सदरील पुरस्कारांसाठी निवड केली जाईल. नामांकनाची माहिती पाठवल्यावर सन्मानपत्र व सन्मानचिन्हावर स्वतःचे नाव, आईचे नाव,आडनाव असेल तसेच महत्त्वाची बाब म्हणजे पुरस्कारांसाठी स्वागत मूल्य 1000/- रुपये फी आकारण्यात आली असून पुरस्कारातून जी रक्कम जमा होईल ती रक्कम पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शौक्षणिक साहित्य खरेदी करून वितरित करण्यात येणार आहे तसेच सह्याद्री रत्न निलेश बापट सरांच्या परिवाराला थोडी आर्थिक मदत करण्याचा मानस वर्ल्ड फॉर नेचर इंडिया रत्नागिरी जिल्हा शाखा व सर्व पदाधिकारी, सदस्य यांचा आहे.
















