🔴 पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्यात कारवाई न केल्यास काय करावे?
नागरिकांनी ‘हे’ पावले उचलून मिळवू शकता न्याय!
एखाद्या व्यक्तीने चोरी, फसवणूक यासारख्या दखलपात्र गुन्ह्याची तक्रार पोलिसांना तोंडी किंवा लेखी स्वरूपात दिली आणि तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, तर नागरिकांनी काय करावे हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
एफआयआर नोंदवण्यासाठी आवश्यक पावले:
- तोंडी किंवा लेखी तक्रारीनंतरही एफआयआर घेत नसेल, तर त्वरित लेखी तक्रार देऊन तिची पोहोच (acknowledgment) घ्या.
- सीसीटीव्ही फूटेज, कॉल रेकॉर्ड, साक्षीदाराचे निवेदन असे उपलब्ध पुरावे संलग्न करा.
- ई-मेल, स्पीड पोस्ट किंवा ऑनलाईन पोर्टलवरून तक्रार नोंदवून पुरावा तयार ठेवा.
- RTI (माहितीचा अधिकार) कायद्याअंतर्गत तपासणी व कारवाईबाबतची मागणी करा.
- पोलिसांनी टिपण दिले पण कारवाई केली नाही, तर वरिष्ठ अधिकारी (DySP / SP) यांच्याकडे लेखी तक्रार करा.
FIR नोंदणीसाठी कायदेशीर पर्याय:
- RTI द्वारे मागवा:
- तक्रारीची नोंद झाली का?
- FIR रजिस्टर, जनरल डायरी / स्टेशन डायरीतील नोंदी
- चौकशी अहवाल / झालेली कारवाई
- संबंधित अधिकाऱ्याच्या कर्तव्य अपालनाबाबत माहिती
- न्यायालयात अर्ज:
- मॅजिस्ट्रेट कोर्टात अर्ज करून FIR नोंदवण्याचे आदेश मागता येतात.
- न्यायालय पोलीस तपासाचे आदेश देऊ शकते.
निष्कर्ष:
पोलिसांनी दुर्लक्ष केल्यास नागरिकांना कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. तक्रारीची योग्य पद्धतीने नोंद व पुराव्यांची नोंद ठेवा आणि वेळेवर योग्य स्तरावर पाठपुरावा केल्यास न्याय मिळवता येतो.
#FIR #PoliceComplaint #CrimeLaw #RTI #LegalRights #FIRProcedure #माहितीचा_अधिकार #न्याय
फोटो

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators