*गुहागर तहसीलदारांनी आदेश देऊनहीं मंडल अधिकारी व तलाठी कार्यालयासमोर “नागरिकांची सनद” फलक अद्याप लावण्यात आले नाहीत..!*
*माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे
आबलोली – संदेश कदम (प्रतिनीधी):
कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा यांची सूची किंवा सेवा तसेच अशा सुविधा किंवा सेवा सर्वसामान्य जनतेला पुरविण्यासाठी असलेली कालमर्यादा म्हणजेच नागरिकांची सनद यांचे फलक तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयात दिसून येत नाही अशी तक्रार गुहागर तालुक्यातील तवसाळ येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे यांनी २२ जुलै २०२४ रोजी “आपले सरकार” पोर्टलवर तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गुहागर तहसिलदार परिक्षीत पाटील यानी या तक्रारीची त्वरित दखल घेऊन तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ कार्यालयात ज्या ठिकाणी “नागरिकांची सनद”चे फलक लावण्यात आलेल्या नाहीत किंवा सुस्थितीत नाही तेथे दर्शनी भागावर लावुन त्याबाबतचा अहवाल दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी तहसिल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु काही ठिकाणी अद्यापही याबाबतचे फलक मंडळ अधिकारी किंवा तलाठी कार्यालयासमोर लावण्यात आलेले नाहीत. तरी तहसीलदार महोदय यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नदीप गडदे यांनी केली आहे.

Author: Ratnagiri Vartahar
⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️