जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्पातील कारवाईवर ग्रामस्थांचा संताप; जमीन अधिग्रहण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

 

गुहागर (सुजित सुर्वे प्रतिनिधी :

मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरी जीवनाला कंटाळून निवृत्तीनंतर आपल्या मूळ गावी शांततेत आयुष्य घालवावे, निसर्गाच्या सान्निध्यात आणि आप्तेष्टांच्या सहवासात दिवस काढावेत, अशी स्वप्ने अनेक कोकणी चाकरमानी पाहत असतात. गावात येणारे सण, शिमगोत्सवाच्या पालख्या, नातेवाईकांची भेट आणि गावची माती – या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा, हीच भावना मनात ठेवून अनेकजण आपली आयुष्यभराची कमाई गावात घर बांधण्यासाठी खर्च करतात.

आणि त्याचं घर बुलडोझर ने त्याचे समोर पाडलं गेलं….

अशीच एक स्वप्ने घेऊन शरद तवसाळकर यांनी आपल्या पत्नीच्या इच्छेनुसार आयुष्यभराची बचत खर्च करून तवसाळ येथे छोटेसे घर बांधले होते. मात्र हेच घर त्यांच्या डोळ्यासमोर बुलडोझरने पाडले गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रकल्प असलेल्या मुंबई–गोवा महामार्गाच्या कामासाठी जयगड–तवसाळ (रेवस रेड्डी) पूल उभारण्यात येत आहे. या पुलाच्या कामाची अंमलबजावणी अशोका बिल्डकॉन कंपनी करत असून त्या कामासाठी अडथळा ठरत असल्याचे कारण देत दिनांक ७ मार्च रोजी तवसाळकर यांचे घर बुलडोझरने पाडण्यात आले.

या कारवाईवेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तवसाळकर कुटुंबियांनी सांगितले की, घर पाडण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना किंवा मोबाईलद्वारे संपर्क करण्यात आला नव्हता.

तवसाळकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की,

“ऐन उन्हाळ्यात आमच्या घरासमोरील पिण्याच्या पाण्याची विहीरही बुजवण्यात आली. त्यामुळे आमच्या कुटुंबाला पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. आम्हाला पाण्यावाचून त्रास द्यायचा हेतू तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.”

या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक अवस्था चिंताजनक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच योग्य त्या कायदेशीर मार्गाने या कारवाईविरोधात तक्रार करून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली असून काजू, आंबा आणि नारळाची झाडे तोडल्याचा आरोपही स्थानिक शेतकरी करत आहेत. कंपनी, काही अधिकारी आणि स्थानिक पुढाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

लोकांची घरं झाडे बागायती नष्ट करून कोकणचा विकास करणारा प्रकल्प…..?

यामुळे प्रभावित शेतकरी आणि जमीनमालकांमध्ये असंतोष वाढला असून कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारून न्याय मिळवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या घटनेने मानवी हक्क यांची पायमल्ली करण्यात आली असाही सूर लोकभावनेतून येतोय.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास

भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने...
Read More
भारतीय संघाचा ऐतिहासिक पराक्रम! न्यूझीलंडचा धुव्वा उडवत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला; घरच्या मैदानावर रचला इतिहास

रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव मंजिरी मराठे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला लाभली रुपेरी झळाळी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
रौप्यमहोत्सवी कविसंमेलनात आरती प्रभू यांच्या काव्याचा सुरेल उत्सव

मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार ९ मार्चला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; १० मार्चपासून...
Read More
मनसेचा २० वा वर्धापनदिन : राज ठाकरे रायगडावरून सदस्य नोंदणीची सुरुवात करणार

जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू मुंबई–गोवा महामार्ग प्रकल्पातील कारवाईवर ग्रामस्थांचा...
Read More
जयगड–तवसाळ पुलासाठी घरावर बुलडोझर; तवसाळकर कुटुंबाचा आरोप – पूर्वसूचना न देता कारवाई, न्यायासाठी लढा सुरू

रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

📰  रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी 🔹 : शिमगोत्सवातील किरकोळ वादाचा राग; तिघांविरोधात गुन्हा...
Read More
रत्नागिरीत चाकू हल्ला; मिरकरवाडा जेटीजवळ व्यक्तीवर सपासप वार, एक गंभीर जखमी

देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम, नागरिकांच्या खिशावर वाढता भार

📰 : गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महाग; पेट्रोल-डिझेल दर मात्र स्थिर   🔹 : देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा...
Read More
देशभरात घरगुती LPG दरवाढ; आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम, नागरिकांच्या खिशावर वाढता भार

न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा 🔹: उशिरा अपील करून वेळकाढूपणा करणाऱ्यांना अवमान कारवाईपासून सुटका...
Read More
न्यायालयीन आदेश टाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा

खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन आबलोली (संदेश कदम) शिवसेना शिंदे गटाचे गुहागर विधानसभा समन्वयक...
Read More
खेड तालुक्यातील तळे गावात शिमगो उत्सवानंतर घरोघरी देवी देवतांचे जल्लोषात आगमन

कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार तळवली (मंगेश जाधव) गुरुवार दिनांक ५/०३/२०२६ रोजी गुहागर...
Read More
कुटगिरी गावठण तरुण विकास मंडळ आयोजित पालखी नृत्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप

येथे दिलेल्या माहितीवर आधारित एक सविस्तर आणि 'SEO' (Search Engine Optimization) पूरक बातमी खालीलप्रमाणे आहे: मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८...
Read More
मराठा-ओबीसी आरक्षणावरून नवा वाद: ४८ लाख कुणबी नोंदींच्या आकडेवारीवर बबनराव तायवाडे आणि विनोद पाटील यांचे गंभीर आरोप