सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सिंधुदुर्गातील आंबा-काजू शेतकऱ्यांना तात्काळ भरघोस नुकसानभरपाई द्या; माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

मोहर जळाल्याने ८० ते ९० टक्के नुकसान; मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


मुंबई : प्रतिनिधी

हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे तब्बल ८० ते ९० टक्के नुकसान झाल्याने बागायतदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील मंत्रालयात भेट घेऊन केली.

या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत व पुनर्वसन विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली आहे.

माजी आमदार वैभव नाईक यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार तसेच संबंधित व्यापारी वर्ग सध्या अत्यंत गंभीर आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. हवामानातील प्रतिकूल परिस्थिती, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च तसेच बाजारातील दरातील मोठी घसरण आणि अनिश्चितता यामुळे शेतकरी व व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचे वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

निवेदनामध्ये आंबा व काजू बागायतदारांच्या काही महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि भरघोस नुकसानभरपाई जाहीर करणे, आंबा व काजू पिकांसाठी घेतलेली सर्व कर्जे गोठवून त्यांचा कर्जमाफी योजनेत स्पष्ट समावेश करणे, औषधे व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवून बनावट कंपन्यांवर कठोर कारवाई करणे, तसेच उसाप्रमाणे आंबा व काजू पिकांसाठी जास्तीत जास्त हमीभाव निश्चित करणे या मागण्यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो बागायतदारांचे अर्थकारण आंबा आणि काजू पिकांवर अवलंबून असल्याने शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

लग्नाच्या वाढदिवसा दिनी समाजसेवेचा आदर्श – शिवणे नं. २ शाळेला देणगी, दोन मुलींचे दत्तक संगोपन

लग्नाच्या वाढदिवसा दिनी समाजसेवेचा आदर्श - शिवणे नं. २ शाळेला देणगी, दोन मुलींचे दत्तक संगोपन आबलोली (संदेश कदम) आजच्या जगातही...
Read More
लग्नाच्या वाढदिवसा दिनी समाजसेवेचा आदर्श – शिवणे नं. २ शाळेला देणगी, दोन मुलींचे दत्तक संगोपन

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६; ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६; ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान नवी दिल्ली :- केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त...
Read More
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६; ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; व्हाईट हाऊस डिनरमध्ये गोळीबार, सुरक्षा यंत्रणांची तात्काळ कारवाई

💥 डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; व्हाईट हाऊस डिनरमध्ये गोळीबार, सुरक्षा यंत्रणांची तात्काळ कारवाई अमेरिकेत मोठी सुरक्षा चूक उघड; 10...
Read More
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; व्हाईट हाऊस डिनरमध्ये गोळीबार, सुरक्षा यंत्रणांची तात्काळ कारवाई

खंडाळा येथे ‘खंडाळा उत्सव’ उत्साहात संपन्न; ग्रामीण नागरिकांना नवा आनंद

खंडाळा येथे ‘खंडाळा उत्सव’ उत्साहात संपन्न; ग्रामीण नागरिकांना नवा आनंद खंडाळा (प्रतिनिधी) : निलेश रहाटे रत्नागिरी तालुका मधील खंडाळा येथे...
Read More
खंडाळा येथे ‘खंडाळा उत्सव’ उत्साहात संपन्न; ग्रामीण नागरिकांना नवा आनंद

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातील मोठा घोटाळा? पोस्टमनकडून दीड वर्षांची टपाल न वितरित

वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातील मोठा घोटाळा? पोस्टमनकडून दीड वर्षांची टपाल न वितरित ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उघडकीस प्रकार; घरातून सापडली न पोहोचवलेली टपालाची...
Read More
वेळणेश्वर पोस्ट कार्यालयातील मोठा घोटाळा? पोस्टमनकडून दीड वर्षांची टपाल न वितरित

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला   “लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व...
Read More
शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

'वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित...
Read More
वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई

कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई नवीमुंबई (मंगेश जाधव) कामोठे प्रभाग...
Read More
कामोठे प्रभागात अतिक्रमणाविरोधात महापालिकेची धडक कारवाई अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत नर्सरी आणि विक्रेत्यांवर तोडक कारवाई

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश बहादुरशेख नाका दुर्घटनेनंतर सुरक्षा उपाययोजनांवर भर; दर्जेदार साहित्य...
Read More
चिपळूणमध्ये उड्डाणपुलाच्या कामाची आमदार भास्कर जाधव यांची पाहणी; पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश

क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला - ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश आबलोली...
Read More
क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला – ॲड.संकेत साळवी यांच्या युक्ती वादाला यश