विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही – रश्मी गोखले यांची टिका..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही – रश्मी गोखले यांची टिका..!

आबलोली (संदेश कदम) 

मी जेव्हा गुहागर तालुक्यात आली आहे .मी गुहागर तालुक्यात फिरतेय त्यामुळेच मला समजतेय की, या इथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी काहीही विकास केलेला नाही अशी टिका शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा महिला संघटक रश्मी गोखले यांनी गुहागर तालुक्यातील आबलोली येथे पत्रकारांशी बोलताना केली.

शिवसेना शिंदे पक्ष, भाजपा, रिपब्लिकन पक्ष आठवले, राष्ट्रवादी अजितदादा आणि बळीराज सेना मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार,लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपूत्र, माजी सभापती, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या आबलोली येथील प्रचार दरम्यान आबलोली वरची पागडेवाडी येथील सभागृहात आबलोली येथील पत्रकारांशी उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटक रश्मी गोखले यांनी संवाद साधला

यावेळी त्यांनी विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही अशी टिका करुन मी या मतदारसंघातील १५ गाव फिरले, ७२ गाव फिरले परंतू मला तिथे विकास झालेला दिसलाच नाही. १५ गावात मी रामदास भाई यांचे समवेत फिरले रस्त्या बद्दल खूप राग आला तेथील रस्ते असे आहेत की बैलगाडीतच बसलेय असा मला भास होत होता. म्हणजे विकास कुठ केला मग २० वर्ष तुमच्या हातात जर इथली सत्ता होती परंतू तुंम्ही लोकांसाठी काहिहि करु शकत नाही म्हणूनच मी गुहागर तालुक्यातील जनतेला विनंती वजा आवाहन करीत आहे की, या वेळेला तुंम्ही बदल घडवा. आता इथे बदल हवाय आपल्याला जर आपल्याला विकास हवा असेल आपला सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपल्याला इथे बदल घडवायला हवा आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश बेंडल यांच्या धनुष्यबाण निषाणी समोरील बटन दाबून राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी निवडून आणा असे स्पष्ट मत रश्मी गोखले यांनी मांडले

जर विकास झाला नाही असे तुंम्ही म्हणताय तर गेले तीन टर्म भास्करशेठ जाधव या गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात जर विकास केला नाही तर इथली मतदार जनता त्यांच्या पाठी का? उभी रहाते या हा प्रश्न माझ्या सारख्या अनेक पत्रकारांना पडतोय या प्रश्नावर उत्तर देताना रश्मी गोखले पुढे म्हणाल्या की,हा प्रश्न आंम्हाला हि पडतोय या का? चे उत्तर आपण देऊ शकत नाही. कारण आज त्यांचे एवढे इथे वर्चस्व आहे की, कारण लोक घाबरत असतील त्यांना इथली गावातली साधी लोकं आहेत हि शहरातली लोकं नव्हेत.

कोणत्या पध्दतीचा विकास होणे गरजेचे आहे. तुमची अपेक्षा काय आहे या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मी गोखले म्हणाल्या की, मी गुहागर तालुक्यात आलेय अंजनवेल येथील मी शाळा बघितल्या या शाळेत विज पुरवठा नाही फॅन नाही तरी ती मुले शाळेत बसतात १५ -१५ पाणी येत नाही. पाण्याचा गंभीर प्रश्न आहे.असे सांगून रश्मी गोखले पुढे म्हणाल्या मला सांगा गुहागर आहे हे गुहागर आता किती डेव्हलप व्हायला पाहिजे होते पण गुहागर डेव्हलप झाले का? गुहागरला पर्यटक ज्या प्रमाणात येतात त्या प्रमाणात गुहागर डेव्हलप झालेले नाही असेहि रश्मी गोखले यांनी सांगितले

तुंम्ही राजेश दादा यांचा प्रचार करताय तुमच्या काय अपेक्षा आहेत. तुंम्ही काय डेव्हलप करणार, तुंम्ही कोणत्या उपाय योजना करणार आणि विकासात्मक कोणते मुद्दे घेऊन जाणार या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मी गोखले यांनी आवर्जून उल्लेख केला की, पहिलं शाळा आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न, महिलांच्या जवळचा प्रश्न महिलांना आजही दूर वरुन पाणी आणावे लागते महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला पाहिजे, रस्ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत वाडी वस्तीवर, घरा घरापर्यंत रस्ते, पाखाड्या झाल्या पाहिजेत लोकांना सोयी सुविधांचा लाभ मिळालाच पाहिजे असे स्पष्ट मत शिवसेना शिंदे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटक रश्मी गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेच्या चिपळूण तालुका महिला शहर समन्वयक तेजस्विता साटम, शिवसेनेच्या गुहागर तालुका महिला कार्यकर्त्या मिलन कनगुटकर, आबलोलीच्या माजी सरपंच श्रावणी पागडे,प्रिती पागडे, तृप्ती पागडे आदी. महिला उपस्थित होत्या.

संपूर्ण मुलाखत आमच्या रत्नागिरी वार्ताहर चे RV News YouTube वर पहा ????????

https://youtu.be/43D-BPqlabA

 

 

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न