रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ किर्ती किरण पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकाऱ्य पदावर बदली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ किर्ती किरण पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकाऱ्य पदावर बदली

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेचे लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) किर्ती किरण पुजार यांची बदली झाली असून ते आता धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते गुरुवारी (दि. २९ फेब्रुवारी) धाराशिव येथे पदभार स्वीकारतील.

रत्नागिरीत उत्कृष्ट कार्याची चुणूक

किर्ती किरण पुजार यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते अल्पावधीतच जिल्ह्यात लोकप्रिय झाले होते.

सोलर प्रोजेक्ट आणि हाऊस बोट – स्वप्नपूर्तीपूर्वीच बदली

किर्ती किरण पुजार यांनी सोलर प्रोजेक्ट आणि हाऊस बोट हे दोन महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले होते. नुकतेच हे प्रकल्प अंतिम टप्प्यात आले असतानाच त्यांच्या बदलीची ऑर्डर आली. त्यांच्या या योजनांमुळे जिल्ह्यात पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्राला चालना मिळणार होती.

सहकार्याबद्दल कृतज्ञता

धाराशिवचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे आणि जनतेचे आभार मानले. “माझ्या कार्यकाळात सर्वांचे उत्तम सहकार्य लाभले. हे सहकार्य नव्या जबाबदारीतही असेच राहील अशी अपेक्षा आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

धाराशिवच्या जिल्हाधिकारीपदाची नवी जबाबदारी

गुरुवारी धाराशिव जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विभागाच्या विकासासाठी ते कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या कार्यशैलीचा अनुभव घेतलेल्या अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना त्यांच्या नव्या भूमिकेतूनही अशीच सकारात्मक ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...