महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ चा गैरव्यवहार राजापुर तालुक्यात अधिक
प्रस्तावित प्रकल्प जमीन संपादित क्षेत्रात अधिक वापर
तालुक्यातील कोंडे तर्फे सौदळ, बारसु, सोलगाव, गोवळ,शिवणे खुर्द,धाऊलवल्ली,नाटे मध्ये अधिक दुरूयोग
समिर शिरवडकर – रत्नागिरी
राजापूर:- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम १५५ चा दुरुपयोग करून, राजापुर तालुक्यात किंबहुना संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील कलम १५५ चा दुरूयोग करून सामान्य जनतेच्या जमिनी, देवस्थान इनाम जमिनी, अतिरिक्त जमिनी, तसेच शासनाच्या जमिनीवर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्यां मदतीने जबरस्तीने हडप करून त्या हडप केलेल्या जमिनी परस्पर प्रकल्पाला किंव्हा धनदांडग्याना विकून त्यातून जो मलिदा कमाविला आहे, आश्यना आत्ता चांगलाच चाप बसणार आहे.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात महसूल मंत्री चंदकांत बावनकुळे यांनी तसा आदेश पारित केला आहे.यात कलम १५५,कलम ७०ब,आणि कलम ८५ यांचा मोठ्या प्रमाणत दुरूयोग होत आहे,यात कोकण सुद्धा मागे नाही मागील पाच वर्षा मधील नोंदी आणि फेरफार याची सखोल चौकशी करणार असून,यात किती मासे गळाला लागतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रचे लक्ष आहे,याची सुरुवात पुणे मधून झाली आहे.
राजापूर तालुक्यात काही वर्षा पासून अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत.त्यासाठी लागणारी जमिनी घेण्यासाठी अनेक दलालांनी महासूल यंत्रणेच्या साहाय्याने कलम १५५ चा दुरूयोग करून भूमिहीन शेतमजूर यांना दिलेल्या, अतिरिक्त जमिनी, देवस्थान इनाम जमिनी,महाराष्ट्र शासन जमिनी त्याचप्रमाणे शासनाने विक्रीस रोख लावलेल्या ,विक्री न करता येणाऱ्या जमिनी सुद्धा महसूल यंत्रणेच्या सहाय्याने धानदांडग्या लोकांनी हडप केले आहेत ,असे प्रकार राजापूर तालुक्यात बरेच ठिकाणी सापडत आहेत. या जमिनी नुसत्या धानदांडग्या लोकांनीच नाही तर, त्यातील अर्ध्या अधिक जमिनी काही महसूल अधिकाऱ्यांच्या नावे आहेत. असेही कागदोपत्री निदर्शनास आलेले आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम १५५ चा वापर फक्त शुद्धलेखन आणि लिपकीय चुका दुरुस्त करण्यासाठी आहे परंतु महसूल महाशयांनी याचा वापर सरळ सरळ जमीन हडप करण्यासाठी आणि ती विक्री करून त्यातून अफाट मलिदा कमवण्यासाठी धनदांडग्या लोकांनाआणि स्वतःसाठी याचा वापर केलेला आहे. हे सर्व व्यवहार प्रामुख्याने ज्या ठिकाणी प्रस्तावित प्रकल्प घेत आहे अशा ठिकाणी जास्त प्रमाणात झालेला दिसून येत आहे राजापूर तालुक्यातील कोंडे तर्फे सौंदर,बारसु,सोलगाव, शिवने खुर्द, धाऊलवल्ली,नाटे व अन्य ठिकाणी याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे. या सर्व प्रकाराची मागील पाच वर्ष नोंदी,आणि फेरफारांची कसून चौकशी होणार असून यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांची बडतर्फी होऊन अधिकाऱ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होणार आहेत.
*कलम १५५ बाबत मागील पाच वर्षाची नोंदी,आणि फेरफार ची कसून चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.*
*विश्वजीत गाताडे – उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी राजापूर*







