ग्रामपंचायत विभागाकडील तक्रारी तातडीने निकाली काढा! तक्रारींसाठी जिल्ह्यात येऊ नये – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचा निर्देश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

ग्रामपंचायत विभागाकडील तक्रारी तातडीने निकाली काढा!

तक्रारींसाठी जिल्ह्यात येऊ नये – जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांचा निर्देश

???? लोकशाही दिनात बहुसंख्य तक्रारी ग्रामपंचायत विभागाशी संबंधित
???? क्षेत्रीय स्तरावरच जनतेला न्याय मिळावा – अधिकारी अनुपस्थितीवर नाराजी

???? रत्नागिरी, दि. २ जून
“लोकशाही दिनात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाशी संबंधित बहुतेक तक्रारी येतात. अशा तक्रारी आजच संबंधित तक्रारदार आणि अधिकाऱ्यांना बोलावून निकाली काढाव्यात,” असा स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला.
तक्रारी घेऊन जिल्ह्यात येणाऱ्या सामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवरच न्याय मिळाला पाहिजे, यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज पार पडलेल्या लोकशाही दिनाच्या बैठकीत श्री. सिंह यांनी फेब्रुवारीपासून प्रलंबित असलेल्या कशेळी (ता. राजापूर) येथील साक्षी संतोष नाटेकर यांच्या अर्जाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांना आजच ही तक्रार सोडवण्याचे निर्देश दिले.

बैठकीदरम्यान काही अधिकारी प्रत्यक्ष किंवा दूरदृश्यप्रणालीद्वारे अनुपस्थित असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पुढील लोकशाही दिनी प्रत्येक तक्रारीसंदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करावा,” असेही ते म्हणाले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, समाजकल्याण विभागाचे दीपक घाटे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

???? फोटो


????️ हॅशटॅग्स:

#रत्नागिरी #लोकशाहीदिन #जिल्हाधिकारीनिर्देश #ग्रामपंचायततक्रारी #DevendraSingh #RatnagiriNews #सरकारीबैठक #ZPNews


 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...