ग्रामीण भागात काँक्रीटचे रस्ते; शिक्षण सवलत आणि सौरऊर्जा योजनांवर भर – मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण भागात काँक्रीटचे रस्ते; शिक्षण सवलत आणि सौरऊर्जा योजनांवर भर – मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत घोषणा केली की, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून गावांना जोडणारे रस्ते आता सिमेंट काँक्रीटचे करण्यात येतील. यासोबतच, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी १०० टक्के सवलतीची योजना पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण भागातील १४,००० किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच, एक हजार लोकसंख्या असलेल्या ४,००० गावांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येईल. त्यासाठी ‘न्यू डेव्हलपमेंट बँके’कडे अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

सौरऊर्जा आणि वीज दर कपातीचा निर्णय

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २० लाख घरांना मोफत सौरऊर्जा पुरविली जाणार आहे. त्यामुळे या घरांचे वीज बिल शून्यावर येईल. तसेच, राज्यातील ७० टक्के ग्राहक ० ते १०० युनिट वीज वापरतात. नवीन योजनेमुळे या ग्राहकांना घरावर सोलर पॅनल बसवण्याची संधी मिळेल व ते वीजबिलमुक्त होतील.

याशिवाय, १०० ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर १७ टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसा वापरलेल्या विजेवर १० टक्के सवलत दिली जाईल. या निर्णयामुळे ९५ टक्के ग्राहकांना थेट लाभ होणार आहे.

शिक्षणासाठी १०० टक्के सवलत सुरूच राहणार

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांहून कमी असलेल्या मुलींना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी १०० टक्के सवलत देणारी योजना सुरूच राहील. या संदर्भात चुकीचा प्रचार केला जात असून, सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नदीजोड प्रकल्पांचा वेग वाढणार

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा होईल. तसेच, वैनगंगा ते नळगंगा नदी जोड प्रकल्पांतर्गत ३१ नवीन धरणे आणि ४२६ किमी कालवे तयार करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विदर्भातील दुष्काळसदृश परिस्थिती कायमची संपेल.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, वीज दर कपात आणि शिक्षणासाठी मदतीचा मोठा मार्ग मोकळा होणार आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के